शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

ग्राहक आणि विक्रेत्याने जाणले कापडी पिशव्यांचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:21 IST

चाळीसगावात युगंधरा फाउंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वितरण

चाळीसगाव, जि.जळगाव : युगंधरा फाउंडेशनच्या वतीने प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेंतर्गत कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात ग्राहकासोबतच विक्रेत्यांनीही कापडी पिशव्यांचे मोल जाणल्याचे दिसून आले.याप्रसंगी ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी प्लॅस्टिक बंदीसंदर्भात महत्त्व पटवून देत कापडी पिशवी वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी मनोगतातून प्लॅस्टिक विघटन आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले, तर ‘प्लॅस्टीक प्रतिबंधात्मक जनजागृती करुया’,‘चला तर मग आजपासून कापडी पिशवी वापरुया’ याविषयी शपथ घेण्यात आली.युगंधरा फाउंडेशनच्या वतीने बस स्टँड परिसर, गणेश कॉम्प्लेक्स आवार, बाजार हाट, छोटी गुजरी, पोलीस वसाहत आदी भागात सुमारे ३०० ते ३५० कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राहक आणि विक्रेत्यांना कापडी पिशवीचे मोल पटवून देण्यात आले.छोट्या-छोट्या कृतीतून पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. ग्रामीण व शहरी भागात बंदीत समाविष्ट असलेल्या प्लॅस्टीकच्या साधनांचा सर्रासपणे वापर होत होतांना दिसून येत आहे मात्र प्लॅस्टीक बंदीबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती होत नसल्याने प्लॅस्टिक बंदीची घोषणा होऊनही त्याची कृतीशील अंमलबजावणी होताना नागरिक दिसत नाही. तसेच आगामी गणेशोत्सवात प्रत्येक महिलेने घरगुती फुलांची आरास करून कागदी सुशोभिकरणाचे देखावे करावे. जेणेकरुन प्लॅस्टिकचा वापर होणार नाही. तसेच घरातील विनावापरातील साड्या आणि ड्रेसच्या कापडी पिशव्या म्हणून उपयोगात आणाव्यात, असे ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी सांगितले.जलद विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जीवितासदेखील धोका निर्माण होत आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे डॉ.उज्ज्वला देवरे यांनी सांगितले.पर्यावरणास अपायकारक ठरणाºया प्लॅस्टिकच्या वस्तुंवरील बंदी जाहीर झाली असली तरी सुजाण नागरिक व पर्यावरणप्रेमी म्हणून प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरीता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे याची सुरुवात स्वत:पासून केल्यास अभियानाचे फलित होणार आहे, असे युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी नमूद केले.यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा लता जाधव, सचिव राखी संगेले, संगीता सूर्यवंशी, मोनाली भोई, वंदना पाटील, रुपाली चव्हाण, मनीषा पवार, वंदना सूर्यवंशी, कविता शिंदे, वंदना चव्हाण, सुरेखा नाईक, अनिता रोकडे, प्राजक्ता पाटील, जयश्री जगताप, सारा पाटील, साधना पाटील आदी महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवित कापडी पिशवी वापरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.सूत्रसंचालन छाया पाटील यांनी, तर आभार राखी संगेले यांनी मानले, अभियान यशस्वीतेसाठी स्वप्नील कोतकर, नितीन वाल्हे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव