शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक आणि विक्रेत्याने जाणले कापडी पिशव्यांचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:21 IST

चाळीसगावात युगंधरा फाउंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वितरण

चाळीसगाव, जि.जळगाव : युगंधरा फाउंडेशनच्या वतीने प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेंतर्गत कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात ग्राहकासोबतच विक्रेत्यांनीही कापडी पिशव्यांचे मोल जाणल्याचे दिसून आले.याप्रसंगी ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी प्लॅस्टिक बंदीसंदर्भात महत्त्व पटवून देत कापडी पिशवी वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी मनोगतातून प्लॅस्टिक विघटन आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले, तर ‘प्लॅस्टीक प्रतिबंधात्मक जनजागृती करुया’,‘चला तर मग आजपासून कापडी पिशवी वापरुया’ याविषयी शपथ घेण्यात आली.युगंधरा फाउंडेशनच्या वतीने बस स्टँड परिसर, गणेश कॉम्प्लेक्स आवार, बाजार हाट, छोटी गुजरी, पोलीस वसाहत आदी भागात सुमारे ३०० ते ३५० कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राहक आणि विक्रेत्यांना कापडी पिशवीचे मोल पटवून देण्यात आले.छोट्या-छोट्या कृतीतून पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. ग्रामीण व शहरी भागात बंदीत समाविष्ट असलेल्या प्लॅस्टीकच्या साधनांचा सर्रासपणे वापर होत होतांना दिसून येत आहे मात्र प्लॅस्टीक बंदीबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती होत नसल्याने प्लॅस्टिक बंदीची घोषणा होऊनही त्याची कृतीशील अंमलबजावणी होताना नागरिक दिसत नाही. तसेच आगामी गणेशोत्सवात प्रत्येक महिलेने घरगुती फुलांची आरास करून कागदी सुशोभिकरणाचे देखावे करावे. जेणेकरुन प्लॅस्टिकचा वापर होणार नाही. तसेच घरातील विनावापरातील साड्या आणि ड्रेसच्या कापडी पिशव्या म्हणून उपयोगात आणाव्यात, असे ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी सांगितले.जलद विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जीवितासदेखील धोका निर्माण होत आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे डॉ.उज्ज्वला देवरे यांनी सांगितले.पर्यावरणास अपायकारक ठरणाºया प्लॅस्टिकच्या वस्तुंवरील बंदी जाहीर झाली असली तरी सुजाण नागरिक व पर्यावरणप्रेमी म्हणून प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरीता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे याची सुरुवात स्वत:पासून केल्यास अभियानाचे फलित होणार आहे, असे युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी नमूद केले.यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा लता जाधव, सचिव राखी संगेले, संगीता सूर्यवंशी, मोनाली भोई, वंदना पाटील, रुपाली चव्हाण, मनीषा पवार, वंदना सूर्यवंशी, कविता शिंदे, वंदना चव्हाण, सुरेखा नाईक, अनिता रोकडे, प्राजक्ता पाटील, जयश्री जगताप, सारा पाटील, साधना पाटील आदी महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवित कापडी पिशवी वापरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.सूत्रसंचालन छाया पाटील यांनी, तर आभार राखी संगेले यांनी मानले, अभियान यशस्वीतेसाठी स्वप्नील कोतकर, नितीन वाल्हे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव