शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच ...

आगार व्यवस्थापकांची माहिती:

ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच जळगाव आगारातर्फे बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू केले आहेत. तर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या निर्देशानुसार महामंडळाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या सोयीसाठीच बसेस सोडण्याचे ठरवले आहे. या मध्ये सकाळच्या सत्रात बहुतांश नोकरदार वर्ग बाहेरगावी जात असल्याने, या वेळेत संबंधित गावांना बसेस सोडणार आहे. तसेच ग्रामीण भागातही दर तासाला वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता ठरावीक वेळेतच बसेस सोडण्यात येणार आहे. जर एखाद्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल आणि त्यातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या जास्त असल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, या संचारबंदीच्या काळात शासनाच्या सूचनांचे महामंडळातर्फे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. तसेच चालक व वाचकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे बोरसे यांनी सांगितले.