शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच ...

आगार व्यवस्थापकांची माहिती:

ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच जळगाव आगारातर्फे बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू केले आहेत. तर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या निर्देशानुसार महामंडळाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या सोयीसाठीच बसेस सोडण्याचे ठरवले आहे. या मध्ये सकाळच्या सत्रात बहुतांश नोकरदार वर्ग बाहेरगावी जात असल्याने, या वेळेत संबंधित गावांना बसेस सोडणार आहे. तसेच ग्रामीण भागातही दर तासाला वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता ठरावीक वेळेतच बसेस सोडण्यात येणार आहे. जर एखाद्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल आणि त्यातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या जास्त असल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, या संचारबंदीच्या काळात शासनाच्या सूचनांचे महामंडळातर्फे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. तसेच चालक व वाचकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे बोरसे यांनी सांगितले.