शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच ...

आगार व्यवस्थापकांची माहिती:

ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच जळगाव आगारातर्फे बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू केले आहेत. तर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या निर्देशानुसार महामंडळाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या सोयीसाठीच बसेस सोडण्याचे ठरवले आहे. या मध्ये सकाळच्या सत्रात बहुतांश नोकरदार वर्ग बाहेरगावी जात असल्याने, या वेळेत संबंधित गावांना बसेस सोडणार आहे. तसेच ग्रामीण भागातही दर तासाला वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता ठरावीक वेळेतच बसेस सोडण्यात येणार आहे. जर एखाद्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल आणि त्यातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या जास्त असल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, या संचारबंदीच्या काळात शासनाच्या सूचनांचे महामंडळातर्फे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. तसेच चालक व वाचकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे बोरसे यांनी सांगितले.