शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वीज वाहक तार तुटल्याने गायीसह बैल मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:17 IST

भरपाई देण्याची मागणी, अभियंत्यांना घेराव

ममुराबाद : गावहाळ परिसरात गुरुवारी रात्री वीजपुरवठा सुरु असताना अचानक तार तुटून खाली पडल्याने गायीसह बैलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केलीआहे.गावहाळलगत पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर शांताराम रामदास पाटील हे शेतकरी राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे गायीसह बैलजोडी घरासमोर बांधली होती. गुरुवारी रात्री वरून गेलेल्या जीर्ण वीजवाहक तारांपैकी एक तार अचानक तुटुन खाली पडली. काही कळण्याच्या आत विजेचा जोरदार धक्का बसल्याने गाय व एक बैल जागेवरच तडफडून मृत्युमुखी पडले.हाकेच्या अंतरावर बसलेले राजेंद्र भागवत पाटील व इतर काहीजण थोडक्यात बचावले. दरम्यान, आजुबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी विदगाव येथील उपकेंद्राला कळविले. अभियंत्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही.दुसºया दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीच फिरकले नाही.अभियंत्यांना घेराव १२ तासांपेक्षा जास्तवेळ अंधारातजीर्ण तार तुटून पडल्यानंतर विदगाव येथून खंडीत करण्यात आलेला ममुराबाद येथील वीजपुरवठा तब्बल १२-१३ तासानंतर दुसºया दिवशी सुरळीत झाला. ग्रामस्थांना अंधार व उकाड्यातच रात्र काढावी लागली. त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात आली.शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे अभियंता सपके व भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. याप्रसंगी माजी सरपंच रावसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दोन्ही अभियंत्याना घेराव घातला. पंचनामा करुन शेतकरी शांताराम पाटील यांना तातडीने भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच जीर्ण वीज वाहक तारा बदलण्यात याव्या, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव