शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मेहरूण तलाव परिसरात म्हशींचा वावर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराची शान म्हटल्या जाणाऱ्या मेहरूण तलाव परिसरातील जैवविविधतेचे रक्षण व या परिसरातील पक्षी संवर्धनासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराची शान म्हटल्या जाणाऱ्या मेहरूण तलाव परिसरातील जैवविविधतेचे रक्षण व या परिसरातील पक्षी संवर्धनासाठी मनपाकडून स्वतंत्र उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच दररोज होणारी मेहरूण तलावाची दुर्दशा रोखण्यातदेखील महापालिकेला अपयश येत आहे. मेहरूण तलावाच्या पाण्यात दररोज दोनशेहून अधिक म्हशींचा वावर वाढला असून, यामुळे तलावातील पाण्याचे प्रदूषणदेखील वाढत आहे. महापालिकेला तलावात जाणाऱ्या सांडपाण्यावरदेखील अजूनसुद्धा कोणतेही नियोजन करता आलेले नाही, अशा परिस्थितीत आता तलाव परिसरात म्हशींचा वाढत जाणारा वावर तलावातील जैवविविधतेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

मेहरूण तलाव परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असून, या तलाव परिसरात अनेक पक्षीदेखील आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याचा मार्गावर असून, तलाव परिसरातील पर्यावरणदेखील धोक्यात आले आहे. तलावावर जरी जिल्हा प्रशासनाचा हक्क असला तरी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत डीपीडीसी व मनपाच्या तिजोरीतून मेहरूण तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधीचा खर्च केला आहे. एकीकडे तलाव परिसराचे सुशोभीकरण होत असताना दुसरीकडे पर्यावरणीयदृष्ट्या जे लक्ष देण्याची गरज होती, ते लक्ष मनपा किंवा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मेहरूण तलावात परिसरातील रहिवासी इमारतींमधून येणारे घाण पाणी थेट तलावात सोडण्यात आले असून, अनेक वर्षांपासून भारती प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरण संरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांकडून मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, मनपाकडून याबाबत अजूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तसेच तलाव परिसरात वाढत जाणाऱ्या म्हशींचा वावर रोखण्यासाठी महापौरांनीदेखील सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांचेदेखील पालन होताना दिसून येत नाही.