शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लोकसहभागातून उभे राहिलेले भुसावळचे जेतवन बुद्धविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:48 IST

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे.

ठळक मुद्देकंडारी प्लॉट, सम्राट अशोक नगरग्रामस्थांनी एकी करून एकाच रात्री घेतली बैठकअन केली कामाला सुरुवात

हबीब चव्हाणभुसावळ, जि.जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन तापीनदी पात्रातून वीट भट्टीवरून विटा आणल्या आणि श्री गणेशा केला.कंडारी प्लॉटस येथे बुद्ध विहाराची संकल्पना येथील रहिवासी सुमंगल रवींद्र अहिरे, फकिरा हुसले, भिका बागुल, भगवान देवरे, वार्ड अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांनी मांडली. त्यांनी विचार केला की आपल्या गावात चांगले व मोठे बुद्धविहार बांधले पाहिजे यासाठी कंडारी प्लॉटस येथे बैठक घेण्यात आली. फकिरा पहेलवान यांच्या आखाड्याच्या काही तरुणांनीदेखील ह्या कामात सहभाग घेतला. पांडुरंग लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.शिंगारे यांच्या घरासमोर फार मोठे पटांगण होते. त्या ठिकाणी सहा हजार ६० चौरस फूट जागा मोजून एकाच रात्रीच गावातील मुलांनी तापी नदीजवळील वीटभट्ट्यांवर जावून विटा जमा केल्या. मध्यरात्री एक चबुतरा बाळूू मिस्त्री, लहानू गरुड, गौतम मिस्त्री यांनी बांधला. त्या चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते १९८७ मध्ये बुद्धविहाराची पायाभरणी करून लहान मूर्ती स्थापन करण्यात आली.या वेळी उपस्थित पांडुरंग लोखंडे, रवींद्र अहिरे, फकिरा पहेलवान, सुरेश लोखंडे, कैलास ढिवरे, विश्वनाथ पंडित गायक, प्रभाकर देवरे व गावातील नागरिक उपस्थित होते. यानंतर बुद्धविहाराच्या बांधकामासाठी गावातील लोकांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अध्यक्ष भिका बागुल, उपाध्यक्ष म्हसाजी वाघमारे, सोनवणे बाबूजी, सकाभाऊ निकम यांनी गावामधून व भुसावळसह परिसरातून विहार बांधण्यासाठी धम्म दान गोळा करण्यास सुरुवात केली. देणगी गोळा झाल्यानंतर विहार बांधायला सुरुवात झाली.नंतर महेंद्र यशोदे यांनी विहाराचे काम हाती घेतले. देणग्या कमी पडल्यावर काही वर्षे काम बंद करण्यात आले. मग १४ एप्रिल २००१ रोजी बैठक घेण्यात आली. त्यात बुद्धविहाराचे काम कसे होईल यासाठी राजेश आव्हाड, संभाजी सोनवणे, विजय बाºहे यांनी पूर्ण विहार हातात घेऊन तीन महिन्यांत काही प्रमाणात देणग्या गोळा करून पुन्हा विहाराच्या कामाला सुरवात केली.काही प्रमाणात काम पूर्ण झाल्यावर त्या विहाराचे नाव ‘जेतवन बुद्धविहार’ असे ठेवावे असे रवींद्र अहिरे यांनी सुचवले व विहारात सुरेश गायकवाड रा.पारस, जि.अकोला यांनी त्या वेळेस त्यांच्या कामगार कल्याण निधीतून ३५ हजार किमतीची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. यानंतर बुद्ध पौर्णिमेला २५ मे २००२ दिवशी मूर्तीची स्थापना करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढून मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते विहारात मूर्ती बसवून विहारचे उद्घाटन करण्यात आले. त्या दिवसापासून तर आजपर्यंत विहारात समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येतात. दर रविवारी बुद्धवंदना घेण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून विहाराची देखभाल आनंद पुंडलिक खेडकर हे करतात.जेतवन बुद्धविहार येथील पंचधातूची बुद्ध मूर्ती ही बुद्ध (गया) बिहार येथून आणण्यात आली होती. बुद्धविहारात दर वर्षी तीन महिने वर्षावास कार्यक्रम घेतला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले व इतर महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम घेतले जातात.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ