शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुषाला समान दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:59 IST

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़ प्रसेनजित राजाची गोष्ट बघा... एकदा राजा बुद्धासोबत धम्मावर चर्चा करीत होते़ एवढ्यात महालातून एक दूत आला़ त्यांनी राजांच्या कानात सांगितलं की प्रमुख राणी मल्लिकाने एका पुत्रीला जन्म दिला आहे़ राजा हे ऐकून दु:खी झाला़ बुद्धांनी विचारले काय झाले? तुझा चेहरा असा का नाराज झाला़? तेव्हा बुद्धांनी पुढील प्रमाणे उपदेश दिला़ बौद्ध म्हणतात काही स्त्रिया खरोखरच पुरूषांपेक्षा योग्य आणि सुंदर असतात़ त्या आपल्या सासुला आदर्श मानतात आणि स्वत:ही पवित्र असतात़ हे राजा अशी स्त्री महाकुलीन पत्नी बनून, एक श्रेष्ठ मुलाला जन्म देईल, जो पुढे जगात एका जगात एका प्रमुख देशाचा राजा बनेल़ राजाला बुद्धवचन ऐकून गहिवरून आलं आणि त्याच्या राणी आणि कन्येचा स्वीकार केला़हे उच्च स्थानाची बुद्धांची शिकवण आहे़ परंतु आजही मुलींचा जन्म हा आनंदी मानला जात नाही़ जर त्या ठिकाणी मुलगा झाला तर आनंदाला पारावर नसतो़ सर्वोच्च आनंद म्हणजे मुलाचा जन्म अशी आजही भावना आहे़ मनुष्याची उत्पत्ती प्राकृतिक विकासाच्या प्रक्रियेद्वारे झालेली आहे़ या जगात गौतम बुद्धांनी सर्वप्रथम प्राकृतिक नियमांचा उल्लेख केला आहे़ पुरूष असो वा स्त्री जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही़बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरूषाला समान दर्जा आहे़ बौद्ध कालीन शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ बौद्ध धम्म हा प्राकृतिक विलक्षणतेच्या विश्लेषणावर आधारीत असल्या कारणाने स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ स्त्री आणि पुरूष यांना भिक्कू म्हणूननच संबोधले जाते़ बौद्ध संस्कृतीतील स्त्रिया खेमा, मगध नरेश बिंबिसार राजाची राणी असो, सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा, गणिका असलेली आम्रपाली या सगळ्या स्त्रिया सारख्याच़ स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केला़ आजही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़ सदगुण, प्रेम, स्रेह ही क्षणिक नाही तर अनंत काळासाठी असावे. स्त्री ही सदाचाराची ठेव आहे़ उदारता हे स्त्रीचे औषधं आहे़मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त रहाण्याची शिकवण ग्रहण करतो़ मी परस्त्रीकडे वाईट दृष्टीकोनाने बघणार नाही़ अशी बुद्धांची शिकवण धम्मपदात आहे़स्वत:च्या शरीरावरती संयम उत्तम आहे़ वाणीचा संयम उत्तम आहे़ सर्व इंद्रियांचा संयम उत्तम आहे़ सर्व प्रकारे संयमित असण्यामुळे भिक्खु सर्व दु:खातून मुक्त होतो़ हे धम्मपदात असलेले वचन सर्व भिक्खु संघाला उपदेशून आहे़ स्त्रियांना वेगळे आणि पुरूषांना वेगळे असे काही नाही़- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव