शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खान्देशात बीएसएनएल २३२ नविन मोबाईल टॉवर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 18:44 IST

बीएसएनएलच्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

भूषण श्रीखंडे, जळगाव : बीएसएनएलच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जळगाव बीएसएनएल कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तीन महसुली जिल्ह्यात २०२४ पर्यंत २३२ पैकी ८७ मोबाईल टॉवर जळगाव जिल्ह्यात बसविले जाणार असल्याची माहिती जळगाव बी झोन महाप्रबंधक महेश कुमार यांनी दिली.

बीएसएनएलच्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपमहाप्रबंधक जे.पी. दामले, सहाय्यक महाप्रबंधक डी. आर. रायते उपस्थित होते. महाप्रबंधक महेश कुमार म्हणाले, की आजच्या स्थितीला हायस्पीड ४ जी इंटरनेट सेवा नसलेली जळगाव जिल्ह्यातील ९० गावे, धुळे जिल्ह्यातील ४७ व नंदुरबार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये सेवा नसल्याची माहिती समोर आली आहे. या गावांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. याकरीता प्रकल्प जळगाव बीएसएनएल व्यवसाय क्षेत्रासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन महसुली जिल्ह्यांमध्ये मार्च २०२४ पर्यंत एकूण २३२ मोबाईल टॉवर फोर-जी सेवा नसलेल्या गावांमध्ये उभारले जाणार आहेत.

बेरोजगारांना संधी

बेरोजगार तरुणांना शहरी आणि ग्रामीण भागात बीएसएनएल एफटीटीएच कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएलमार्फत काम करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांसाठी टीआयपी नोंदणी रक्कम ११ हजारावरून २ हजार रूपयांपर्यंत शिथिल केली आहे. यासाठी १२ पास किंवा अधिक शिकलेला व्यक्ती बीएसएनएल सोबत त्याचा व्यवसाय करू शकतो अशी माहिती प्रबंधक कुमार यांनी दिली.

टॅग्स :BSNLबीएसएनएल