शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना काळात दलाल शिरजोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा ...

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा काळाबाजार होत आहे. आवश्यक औषधी मिळणे कठीण झाले असताना नातेवाईकांना प्रामाणिकपणे मागणी करून आवश्यक इंजेक्शन न मिळता ते दलालांकडून जादा किंमत देऊन उपलब्ध होत असल्याचा विदारक अनुभव जिल्हावासीय घेत आहे. एकूणच जिल्ह्यातील ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना केल्या तरी दलाल शिरजोर होत असल्याचे दररोजच्या फिरफिरवरून समोर येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला त्यावेळी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण यंदाच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर परिस्थिती सुधारली व सर्वकाही सुरळीत झाल्याचे वाटत होते. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. यंदा तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधींची मागणीदेखील त्या तुलनेत वाढत आहे. ऑक्सिजन मिळणे कठीण झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठी फिरफिर झाली. यासोबतच रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या जणांशी संपर्क साधावा लागत आहे. यात हे इंजेक्शन जादा दराने विक्री होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन थेट रुग्णालयात उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले मात्र तरीदेखील रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची भटकंती कायम आहे. एखाद्या मेडिकलवर गेले असता हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही. बाहेरील व्यक्तीकडून जादा किंमत देऊन ती उपलब्ध होत आहे. यामध्ये चार दिवसापूर्वी पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्यांना पकडले. जळगाव, भुसावळ व अन्य ठिकाणीदेखील अशा कारवाई झाल्या. इतरही इंजेक्शन घ्यायचे झाल्यास ते मिळत नाही. यात गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच याचा अनुभव येत आहे. त्यामुळे त्यांची ही गरज पाहता दलाल त्यांना बरोबर हेरतात व अमुक अमुक इंजेक्शनसाठी इतकी रक्कम मोजावी लागेल, अशी थेट मागणी करतात. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल या ठिकाणी हे इंजेक्शन मिळत नसताना बाहेरील व्यक्ती त्या कशा आणून देतात, ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना झाल्या तरी दलाल शिरजोर ठरत असल्याचे सर्वजण अनुभव घेत आहे. आता यावर पर्याय म्हणून प्रशासन थेट रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करीत आहे. प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहून हे रेमडेसिविर दिले जाते आहे. मात्र एका रुग्णाच्या वाट्याला ते किती येतील, हादेखील प्रश्न आहे. जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या रेमडेसिविरचा पुरवठा पाहता रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर योग्य तोडगा निघणेदेखील गरजेचे आहे.