शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना काळात दलाल शिरजोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा ...

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा काळाबाजार होत आहे. आवश्यक औषधी मिळणे कठीण झाले असताना नातेवाईकांना प्रामाणिकपणे मागणी करून आवश्यक इंजेक्शन न मिळता ते दलालांकडून जादा किंमत देऊन उपलब्ध होत असल्याचा विदारक अनुभव जिल्हावासीय घेत आहे. एकूणच जिल्ह्यातील ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना केल्या तरी दलाल शिरजोर होत असल्याचे दररोजच्या फिरफिरवरून समोर येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला त्यावेळी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण यंदाच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर परिस्थिती सुधारली व सर्वकाही सुरळीत झाल्याचे वाटत होते. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. यंदा तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधींची मागणीदेखील त्या तुलनेत वाढत आहे. ऑक्सिजन मिळणे कठीण झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठी फिरफिर झाली. यासोबतच रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या जणांशी संपर्क साधावा लागत आहे. यात हे इंजेक्शन जादा दराने विक्री होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन थेट रुग्णालयात उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले मात्र तरीदेखील रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची भटकंती कायम आहे. एखाद्या मेडिकलवर गेले असता हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही. बाहेरील व्यक्तीकडून जादा किंमत देऊन ती उपलब्ध होत आहे. यामध्ये चार दिवसापूर्वी पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्यांना पकडले. जळगाव, भुसावळ व अन्य ठिकाणीदेखील अशा कारवाई झाल्या. इतरही इंजेक्शन घ्यायचे झाल्यास ते मिळत नाही. यात गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच याचा अनुभव येत आहे. त्यामुळे त्यांची ही गरज पाहता दलाल त्यांना बरोबर हेरतात व अमुक अमुक इंजेक्शनसाठी इतकी रक्कम मोजावी लागेल, अशी थेट मागणी करतात. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल या ठिकाणी हे इंजेक्शन मिळत नसताना बाहेरील व्यक्ती त्या कशा आणून देतात, ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना झाल्या तरी दलाल शिरजोर ठरत असल्याचे सर्वजण अनुभव घेत आहे. आता यावर पर्याय म्हणून प्रशासन थेट रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करीत आहे. प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहून हे रेमडेसिविर दिले जाते आहे. मात्र एका रुग्णाच्या वाट्याला ते किती येतील, हादेखील प्रश्न आहे. जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या रेमडेसिविरचा पुरवठा पाहता रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर योग्य तोडगा निघणेदेखील गरजेचे आहे.