शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

कोरोना काळात दलाल शिरजोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा ...

कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा काळाबाजार होत आहे. आवश्यक औषधी मिळणे कठीण झाले असताना नातेवाईकांना प्रामाणिकपणे मागणी करून आवश्यक इंजेक्शन न मिळता ते दलालांकडून जादा किंमत देऊन उपलब्ध होत असल्याचा विदारक अनुभव जिल्हावासीय घेत आहे. एकूणच जिल्ह्यातील ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना केल्या तरी दलाल शिरजोर होत असल्याचे दररोजच्या फिरफिरवरून समोर येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला त्यावेळी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण यंदाच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर परिस्थिती सुधारली व सर्वकाही सुरळीत झाल्याचे वाटत होते. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. यंदा तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधींची मागणीदेखील त्या तुलनेत वाढत आहे. ऑक्सिजन मिळणे कठीण झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठी फिरफिर झाली. यासोबतच रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या जणांशी संपर्क साधावा लागत आहे. यात हे इंजेक्शन जादा दराने विक्री होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन थेट रुग्णालयात उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले मात्र तरीदेखील रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची भटकंती कायम आहे. एखाद्या मेडिकलवर गेले असता हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही. बाहेरील व्यक्तीकडून जादा किंमत देऊन ती उपलब्ध होत आहे. यामध्ये चार दिवसापूर्वी पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्यांना पकडले. जळगाव, भुसावळ व अन्य ठिकाणीदेखील अशा कारवाई झाल्या. इतरही इंजेक्शन घ्यायचे झाल्यास ते मिळत नाही. यात गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच याचा अनुभव येत आहे. त्यामुळे त्यांची ही गरज पाहता दलाल त्यांना बरोबर हेरतात व अमुक अमुक इंजेक्शनसाठी इतकी रक्कम मोजावी लागेल, अशी थेट मागणी करतात. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल या ठिकाणी हे इंजेक्शन मिळत नसताना बाहेरील व्यक्ती त्या कशा आणून देतात, ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना झाल्या तरी दलाल शिरजोर ठरत असल्याचे सर्वजण अनुभव घेत आहे. आता यावर पर्याय म्हणून प्रशासन थेट रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करीत आहे. प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहून हे रेमडेसिविर दिले जाते आहे. मात्र एका रुग्णाच्या वाट्याला ते किती येतील, हादेखील प्रश्न आहे. जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या रेमडेसिविरचा पुरवठा पाहता रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर योग्य तोडगा निघणेदेखील गरजेचे आहे.