शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

ब्लॅकस्पॉट असलेल्या शिवकॉलनीत अद्यापही पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिव कॉलनी चौक हा महामार्गावरील शहरातील सर्वांत धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे अपघात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिव कॉलनी चौक हा महामार्गावरील शहरातील सर्वांत धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे अपघात होण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. येथे महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा करून देण्यात आलेली नाही. तसेच एका बाजूने पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्यामुळे तेथून उतारावरून वेगाने वाहने येतात आणि त्यांना थांबविण्यासाठी शिव कॉलनी चौकात कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. सायंकाळच्या वेळी रस्ता ओलांडताना भल्याभल्यांना घाम फुटतो. असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाला मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे आजही येथे अपघाताची भीती कायम आहे. नुकताच याच ठिकाणी ३७ वर्षांच्या तरुणाचा अपघातात बळी गेला आहे.

शिव कॉलनी चौकाला पोलिसांनी रस्ते अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहे. ज्या भागात ५०० मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत असतात, तेथे ब्लॅक स्पॉट पोलिसांकडूनच जाहीर केला जातो. त्यामुळे या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग असणे गरजेचे होते. त्यासाठी नागरिक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी करीत होते.

२०१७ च्या सुमारास महामार्ग प्राधिकरणाकडून खोटे नगर ते कालंका माता मंदिर या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात शिव कॉलनी वगळता इतर सर्व प्रमुख चौकांमध्ये भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल नियोजित करण्यात आले. त्यानंतर शिव कॉलनीवासीयांनी २०२० मध्ये खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही शिव कॉलनीजवळ भुयारी मार्गासाठी प्रयत्न सुरू केले. जनतेला आश्वास्त देखील केले. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतर एक कागदी प्रस्ताव तयार करून नागपूरला महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांकडे पाठविण्यात आला. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

आधी खराब रस्त्याने, मग रस्त्याच्या कामाने देखील घेतले बळी

रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या आधी खराब रस्त्याने अनेकांचे बळी घेतले होते. हा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची मृत्यूचा मार्ग अशी ओळख निर्माण झाली होती, तर आता सुमारे दीड वर्षापासून या आठ किमीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे देखील अनेकांचे बळी जात आहे. शिव कॉलनीत झालेल्या या अपघाताच्या आधीदेखील सालार नगर, मिल्लत नगर येथे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातांनी दोनजणांचे बळी घेतले होते. या महामार्गाच्या कामासाठी आणखी किती बळी जाणार, असा प्रश्न जळगावकर उपस्थित करीत आहेत.

कामाला अपेक्षित वेग कधी

महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडे सध्या कामासाठी फक्त २५ मजूर आणि ६ कर्मचारी आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. या कामाची मुदत जून २०२१ पर्यंतच आहे. त्यामुळे या वेळेत काम करण्याचे आव्हान ठेकेदार संस्थेकडे आहे. सध्या हे काम ७० टक्के पूर्ण झालेले असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.

कोट - सध्या आमच्याकडे फक्त २५ मजूर आहेत आणि सहा कर्मचारी आहेत. आम्ही काही मजूर मध्य प्रदेशातून बोलावले आहेत. ते देखील लवकरच येतील. त्यात सध्या अडचणी आहेत. आम्ही आसपासच्या भागातून मजूर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. - सुजितकुमार सिंग, ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक

महामार्ग

अंतर ७ किमी

किंमत ६१ कोटी

कामाची मुदत जून २०२१