शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकस्पॉट असलेल्या शिवकॉलनीत अद्यापही पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिव कॉलनी चौक हा महामार्गावरील शहरातील सर्वांत धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे अपघात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिव कॉलनी चौक हा महामार्गावरील शहरातील सर्वांत धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे अपघात होण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. येथे महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा करून देण्यात आलेली नाही. तसेच एका बाजूने पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्यामुळे तेथून उतारावरून वेगाने वाहने येतात आणि त्यांना थांबविण्यासाठी शिव कॉलनी चौकात कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. सायंकाळच्या वेळी रस्ता ओलांडताना भल्याभल्यांना घाम फुटतो. असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाला मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे आजही येथे अपघाताची भीती कायम आहे. नुकताच याच ठिकाणी ३७ वर्षांच्या तरुणाचा अपघातात बळी गेला आहे.

शिव कॉलनी चौकाला पोलिसांनी रस्ते अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहे. ज्या भागात ५०० मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत असतात, तेथे ब्लॅक स्पॉट पोलिसांकडूनच जाहीर केला जातो. त्यामुळे या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग असणे गरजेचे होते. त्यासाठी नागरिक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी करीत होते.

२०१७ च्या सुमारास महामार्ग प्राधिकरणाकडून खोटे नगर ते कालंका माता मंदिर या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात शिव कॉलनी वगळता इतर सर्व प्रमुख चौकांमध्ये भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल नियोजित करण्यात आले. त्यानंतर शिव कॉलनीवासीयांनी २०२० मध्ये खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही शिव कॉलनीजवळ भुयारी मार्गासाठी प्रयत्न सुरू केले. जनतेला आश्वास्त देखील केले. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतर एक कागदी प्रस्ताव तयार करून नागपूरला महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांकडे पाठविण्यात आला. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

आधी खराब रस्त्याने, मग रस्त्याच्या कामाने देखील घेतले बळी

रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या आधी खराब रस्त्याने अनेकांचे बळी घेतले होते. हा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची मृत्यूचा मार्ग अशी ओळख निर्माण झाली होती, तर आता सुमारे दीड वर्षापासून या आठ किमीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे देखील अनेकांचे बळी जात आहे. शिव कॉलनीत झालेल्या या अपघाताच्या आधीदेखील सालार नगर, मिल्लत नगर येथे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातांनी दोनजणांचे बळी घेतले होते. या महामार्गाच्या कामासाठी आणखी किती बळी जाणार, असा प्रश्न जळगावकर उपस्थित करीत आहेत.

कामाला अपेक्षित वेग कधी

महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडे सध्या कामासाठी फक्त २५ मजूर आणि ६ कर्मचारी आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. या कामाची मुदत जून २०२१ पर्यंतच आहे. त्यामुळे या वेळेत काम करण्याचे आव्हान ठेकेदार संस्थेकडे आहे. सध्या हे काम ७० टक्के पूर्ण झालेले असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.

कोट - सध्या आमच्याकडे फक्त २५ मजूर आहेत आणि सहा कर्मचारी आहेत. आम्ही काही मजूर मध्य प्रदेशातून बोलावले आहेत. ते देखील लवकरच येतील. त्यात सध्या अडचणी आहेत. आम्ही आसपासच्या भागातून मजूर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. - सुजितकुमार सिंग, ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक

महामार्ग

अंतर ७ किमी

किंमत ६१ कोटी

कामाची मुदत जून २०२१