शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मनपाच्या पाच कोटीच्या कामांना बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:12 IST

मंजुरी मिळूनही कामांचा प्रस्ताव महिनाभरापासून पडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावच नाही

ठळक मुद्देहलगर्जीपणा

जळगाव : महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या नगरोथ्थान अंतर्गत मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीतील कामांना महिनाभरापूर्वी झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. मात्र, मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ५ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव अद्याप विभागीय आयुक्त व शासनाकडे पाठविला गेलेला नाही. त्यामळे विकास कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.नागरिकांच्या मुलभूत कामांसाठी मनपाला वर्षभरापूर्वी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यापूर्वी प्राप्त झाला आहे. त्यातून शहरातील विविध भागातील विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. या निधीतील कामांवरुन सत्ताधारी भाजप व शिवसेनेत वाददेखील झाला होता. त्यानतंर ७ डिसेंबर रोजी झालेल्या विशेष महासभेत या कामांच्या प्रस्तावाला बहुमताने मान्यता देण्यात आली.मान्यता दिल्यानतंर आता एक महिना उलटत आला तरी अद्याप या प्रस्तावाची प्रक्रीयाच प्रशासनाकडून पूर्ण करण्यात न आल्याने या कामांना विलंब होत आहे. या कामांच्या नियोजनाला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी गरजेचे आहे.मात्र, मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यातच आलेला नाही. त्यामुळे महिनाभर हा प्रस्ताव मनपाकडेच पडून आहे.निधी नसल्याची तक्रार आणि निधी मिळाला तर नियोजन नाहीमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण मनपा प्रशासनाकडून दिले जाते व नागरिकांना त्यांच्या मुलभूत सुविधांपासून नेहमी वंचित ठेवण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. एकीकडे आर्थिक परिस्थितीचे कारण मनपाकडून दिले जात असताना दुसरीकडे शासनाकडून मिळालेल्या निधीचे नियोजन देखील मनपाकडून केले जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ५ कोटीच्या निधी मिळून त्याला मनपा महासभेने मंजुरी देवून देखील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला नाही. हीच परिस्थिती २५ कोटी रुपयांच्या निधीदरम्यान पहायला मिळाली. तसेच आॅगस्ट मध्ये मनपाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली १०० कोटी रुपयांच्या निधीचे देखील नियोजन मनपा प्रशासनाकडून चार महिने उलटून देखील अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे मनपाचा भोंगळ कारभारामुळेच नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.