शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

निवडणूक निकालानंतर धान्य, डाळींच्या भाववाढीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:52 IST

वायदे बाजार नियंत्रणात

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून बाजारपेठेत वाढत जाणाऱ्या धान्य, डाळींच्या भाववाढीस आता निवडणूक निकालानंतर ‘ब्रेक’ लागला आहे. इतकेच नव्हे तर गव्हासह डाळींचे भाव काही अंशी कमीदेखील झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ््या टप्प्यात विविध राज्यांमध्ये मतदान सुरू झाले. या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारचे बाजारपेठेवरील नियंत्रण कमी झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा वायदे बाजारातील मंडळी घेऊ लागले होते. त्यामुळे दीड महिन्यातील महागाईचा आकडा पाहिला तर धान्याची चांगली आवक असली तरी त्यांचे भाव वाढत गेले. यात गव्हाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने तर डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. या सोबतच शेंगदाणा तेलाचे भावदेखील ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढले.निवडणूक काळात सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीत कंबर कसून उतरल्याने बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे प्रशासनदेखील निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने बाजारपेठेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दलाल मंडळींचे यात चांगले फावले व त्याचा फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न या मंडळींकडून सुरू झाला. मात्र निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बाजारपेठेत भाववाढ रोखली गेली आहे. नवीन सरकार स्थापन झाले नसले तरी किमान निवडणूक संपल्याने त्याचा वचक तरी वायदे बाजारावर असतो, असे जाणकारांनी सांगितले. यासोबतच प्रशासनाचीदेखील निवडणूक कामातून सुटका झाल्याने त्याचाही परिणाम जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.तूर डाळ २०० ते ४०० रुपयांनी कमीनिवडणूक काळात नव्वदी पार होऊन ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचलेले तूर डाळीचे भाव आता ८७०० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ती ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर तर ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. गेल्या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात याच भावावर स्थिर आहे. भाजीपाल्याचा तुटवडा असताना डाळींचे भाव कमी झाल्याने तेवढाच दिलासा मानला जातआहे.गव्हातही घरसणनिवडणूक काळात २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढलेल्या गव्हाच्या भावात आता ५० रुपये प्रती क्विंटलने घसरण झाली आहे. २३०० ते २४५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवरून ३७५० ते ३९५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.तांदुळाचे भाव स्थिरतांदळाचे भावदेखील सध्या स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.वायदे बाजारामुळे खाद्य तेलालादेखील महागाईची फोडणी बसून शेंगदाणा तेलाच्या भावात वाढ होत जावून ते १३० रुपये प्रती किलोवर पोहचले होते. मात्र आता खाद्य तेलाची भाववाढदेखील थांबली आहे.निवडणूक काळात गहू, डाळ यांची झालेली भाववाढ आता थांबली आहे. यात गव्हाचे भाव काही अंशी कमीदेखील झाले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव