शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

राज्यातील २७ ठिकाणी वाहनांची ब्रेक चाचणी आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:25 IST

ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश  शेजारच्या जिल्ह्यात जावे लागणार वाहनधारकांना२५० मीटर ट्रक आवश्यक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

आरटीओची स्वत:ची जागा नसताना अन्य दुसºया खासगी अथवा सार्वजनिक जागेत वाहनांची योग्यता चाचणी घेण्यात येत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे धोके लक्षात घेता श्रीकांत कर्वे (मुंबई) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.२८/२०१३) दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत १४ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने स्वत:ची २५० मीटर जागा नसलेल्या जिल्ह्यातील आरटीओंनी तातडीने ब्रेक चाचणी थांबविण्याचे आदेश दिले होते. 

राज्यात २७ ठिकाणी  जागा उपलब्ध नाहीराज्यात २७ ठिकाणी आरटीओच्या मालकीचा स्वत:चा २५० मीटरचा ट्रक नाही. त्यामुळे मुख्य सचिवांनी परिवहन बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन तातडीने चाचणीसाठी ट्रॅक तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला गेल्या महिन्यात दिले होते. त्यानुसार सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीत जेथे जागा आहे तेथे तातडीने ट्रक तयार करण्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अद्यापही राज्यातील २७ ठिकाणी ट्रक तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर ही मुदत संपल्याने १ नोव्हेंबरपासून या चाचण्या घेण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त स.बा.सहस्त्रबुध्दे यांनी मंगळवारी काढले आहेत.

जळगावात ट्रॅक तयार करण्याचे काम सुरुजळगाव आरटीओ कार्यालयाने मोहाडी शिवारात पाच एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी ट्रक तयार करण्याचे काम सुरु असून डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाचे काम बाकी आहे. सध्या पिचींगचे काम सुरु आहे, मात्र काम अपूर्ण असल्याने येथे चाचण्या घेता येत नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. धुळे येथेही ट्रक नाही, त्यामुळे जळगावच्या वाहनधारकांना नंदुरबार, बुलढाणा, मालेगाव, नाशिक व औरंगाबाद या जवळच्या आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. येथील काम पूर्ण झाल्यावरच जळगावात चाचण्या होतील.