शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राज्यातील २७ ठिकाणी वाहनांची ब्रेक चाचणी आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:25 IST

ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश  शेजारच्या जिल्ह्यात जावे लागणार वाहनधारकांना२५० मीटर ट्रक आवश्यक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

आरटीओची स्वत:ची जागा नसताना अन्य दुसºया खासगी अथवा सार्वजनिक जागेत वाहनांची योग्यता चाचणी घेण्यात येत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे धोके लक्षात घेता श्रीकांत कर्वे (मुंबई) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.२८/२०१३) दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत १४ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने स्वत:ची २५० मीटर जागा नसलेल्या जिल्ह्यातील आरटीओंनी तातडीने ब्रेक चाचणी थांबविण्याचे आदेश दिले होते. 

राज्यात २७ ठिकाणी  जागा उपलब्ध नाहीराज्यात २७ ठिकाणी आरटीओच्या मालकीचा स्वत:चा २५० मीटरचा ट्रक नाही. त्यामुळे मुख्य सचिवांनी परिवहन बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन तातडीने चाचणीसाठी ट्रॅक तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला गेल्या महिन्यात दिले होते. त्यानुसार सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीत जेथे जागा आहे तेथे तातडीने ट्रक तयार करण्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अद्यापही राज्यातील २७ ठिकाणी ट्रक तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर ही मुदत संपल्याने १ नोव्हेंबरपासून या चाचण्या घेण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त स.बा.सहस्त्रबुध्दे यांनी मंगळवारी काढले आहेत.

जळगावात ट्रॅक तयार करण्याचे काम सुरुजळगाव आरटीओ कार्यालयाने मोहाडी शिवारात पाच एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी ट्रक तयार करण्याचे काम सुरु असून डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाचे काम बाकी आहे. सध्या पिचींगचे काम सुरु आहे, मात्र काम अपूर्ण असल्याने येथे चाचण्या घेता येत नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. धुळे येथेही ट्रक नाही, त्यामुळे जळगावच्या वाहनधारकांना नंदुरबार, बुलढाणा, मालेगाव, नाशिक व औरंगाबाद या जवळच्या आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. येथील काम पूर्ण झाल्यावरच जळगावात चाचण्या होतील.