शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:01 IST

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रारबोढरे व शिवापूर शेतकºयांची फसवणूकनिवेदनाच्या प्रति प्रशासनाकडेसात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने सुरू केला वीज निर्मिती प्रकल्प

चाळीसगाव, जि.जळगाव :  तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.तहसीलदार कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वषार्पासून पीडित शेतकरी हे शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. महसूल राज्यमंत्र्यांकडे दोनवेळा या बाबतच्या बैठका झाल्या. त्यांनी चौकशीचे आदेश देवूनही शेतकºयांना न्याय मिळालेला नाही. शंभरपेक्षा अधिक शेतकºयांची फसवणूक झाल्याप्रकरणी महसूल प्रशासनाकडे हरकती घेतल्या आहेत. खरेदी व्यवहाराला दीड ते दोन वर्ष उलटला मात्र सात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या कंपन्यांकडे अधिकृत कागदपत्रदेखील नाही ही बाब मुंबई येथे झालेल्या राज्यमंत्री राठोड यांच्या समोर उघडकीस येवूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पीडित शेतकºयांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पीडित शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति प्रधान मंत्री नवी दिल्ली, मुख्यमंत्री मुंबई, तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भरत चव्हाण, भीमराव जाधव, प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर भाई शेख, राजू चव्हाण, विश्वजीत नायक, देवेंद्र कुमार नायक आदींच्या स्वाक्षºया आहेत.