शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : त्याच त्या आश्वासनांना आता कंटाळलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:56 IST

नंदुरबार ते अक्कलकुवा ६५ किमी

मनोज शेलारनंदुरबार : वर्षानुवर्षे तेच ते प्रश्न, समस्या कायम आहेत. दरवेळी आश्वासने मिळतात, परंतु प्रश्न सुटत नाहीत. असे असले तरी योजनांच्या अंमलबजावणीची गती वाढली, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या या बाबीदेखील नाकारून चालणार नाही असा एकूणच सूर नंदुरबार-अक्कलकुवा प्रवासादरम्यान विद्यार्थी व नोकरदारांकडून ऐकावयास मिळाला.नंदुरबार ते अक्कलकुवा प्रवासात एकूणच निवडणुकीविषयी नागरिकांच्या मनात काय चालले याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या नंदुरबार-अक्कलकुवा या निझरमार्गे धावणाऱ्या बसमध्ये बहुतांश अपडाऊन करणारे नोकरदार आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीच जास्त होते. बसने नंदुरबार सोडल्यानंतर जवळ बसलेल्या काहींना निवडणुकीविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नोकरदार बोलण्यास कचरले, परंतु मुद्यांना हात घालताच त्यांनी विविध बाबींवर मते मांडली. सातपुड्यात आजही बेरोजगारी, स्वयंरोजगाराचा अभाव, उत्पादीत होणाऱ्या आंबा, सीताफळ, महूफुले यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे प्रश्न आहेत. दळणवळणाची सुविधा काही प्रमाणात सुधारली आहे. दºयाखोºयात मोबाइल नेटवर्क मिळू लागले आहे. वाहने जाऊ लागली आहेत. परंतु हाताला काम नाही त्याचे काय? असा प्रश्न एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उपस्थित केला. दरवर्षाचे स्थलांतर पाचवीला पुजलेले आहे. आश्वासने मिळतात, परंतु कामाचा ठिकाणा नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी आकडे कागदावर रंगविले जातात. गरोदर महिला, माता मृत्यू यांचे प्रमाण जैसे थे आहे. मलिदा खाणारे गब्बर तर आदिवासी अधिकच कुपोषित होत चालले आहेत. कुठे आहेत योजना आणि कोण त्या राबवित आहेत याचेही सोशल आॅडिट होणे गरजेचे असल्याचा सूर बसमधील बहुतेक सुशिक्षित मतदारांनी व्यक्त केला.‘विकास’ची तुलना...प्रवासात गुजरात हद्दीतील १५ ते २० किलोमीटरचा भाग होता. त्या भागातील प्रवासीही बसमध्ये होते. त्यांनीही ‘विकासा’ची तुलना केली. त्यांच्याही आदिवासी भागातील समस्या काही वेगळ्या नाहीत. हे चर्चेवरून स्पष्ट झालेच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव