शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कॉर्पोरेट टॅक्स कपातीचा बुस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 13:30 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्याने जळगावातील सुवर्ण व्यवसायासह डाळ व पाईप उद्योगालाही बुस्टर डोस मिळणार आहे. कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने सुवर्ण व्यावसायावर नव्हे तर व्यावसायिकांच्या लाभावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टॅक्स कमी केला असली तरी सोने-चांदीचे भाव कमी होणार नसून केवळ सुवर्ण आभूषणे तयार करणाऱ्या उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. कर कमी करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून ३७ हजार ८०० रुपयांवर पोहचले तर चांदी ४७ हजार ५०० रुपयांर स्थिर आहे. भारतात सुवर्ण आभूषणांनाही मोठे महत्त्व असल्याने या व्यवसायातही मोठी उलाढाल होत असते. त्यात सुवर्णनगरी जळगावात हा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींचा कर भरण्यात मोठा हातभार असतो. सोने-चांदी व्यवसायावर याचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहे. वर्ष अखेर आयकर भरताना त्यावर लागणाºया कार्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वेळी हा कर भरला जाईल, त्या वेळी त्याचा लाभ व्यावसायिकांना होणार आहे. मात्र तोदेखील सर्व सुवर्ण व्यावसायिकांना नाही तर जे आभूषण तयार करतात, त्यांनाच हा लाभ होणार आहे. व्यावसायिक वर्षअखेरीस जो कर भरतात त्यात ही सूट असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना मिळणे शक्य नाही. जळगावात दीडशेच्यावर सुवर्ण पेढ्या असल्या तरी आभूषण निर्माते केवळ आठच आहेत. त्यामुळे ग्राहकांना इतर सुवर्ण व्यावसायिक लाभ देऊ शकत नाही. सोन्यावरील जीएसटी व सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी केले असते तर सोन्याचे भाव कमी झाले असते व त्याचा ग्राहकांना लाभ झाला असता. केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क वाढविल्याने सोन्याचे भाव वाढले होते. मात्र शुक्रवारी कार्पोरेट टॅक्स कमी केला असला तरी सोन्याचे भाव १०० रुपयांनी वाढून ते ३७ हजार ७००वरून ३७ हजार ८००वर गेले.छोट्या पाईप उद्योगांना मिळणार चालनाजळगावात सुवर्ण व्यवयासासह पाईप उद्योगही मोठा आहे. पाईपच्या दोन मोठ्या व १० प्रा.लि. कंपन्या जळगावात असून कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने त्याचा लाभ मोठ्या कंपन्यांना होणार आहे. मात्र इतर प्रा.लि. कंपन्यांना त्याचा लाभ होणार नसला तरी मोठ्या कंपन्यांमुळे या कंपन्यांना चालणा मिळू शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यामुळे या निर्णयाचे पाईप उद्योगातूनही स्वागत होत आहे.मंदावलेल्या डाळ उद्योगांना येईल भरारीकार्पोरेट टॅक्स कमी केल्याने देशातील ४० टक्के डाळीचे उत्पादन असणाºया जळगावातील दालमिलला मोठा लाभ होणार आहे. उद्योग जगतातील मंदीचा फटका दालमिललाही बसण्यासह निसर्गाच्या लहरीपणामुळे कडधान्याचे उत्पादन घटल्याने दालमिलच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मात्र आता हा कर कमी केल्याने जळगावातील ६५ दालमिलला नक्कीच फायदा होऊन उद्योग वाढीस चालना मिळणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव