शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

धाकट्याच्या मदतीला आला थोरला; बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 06:02 IST

हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या  वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता.

जळगाव : वयाच्या २४ व्या वर्षी थॅलेसेमियाग्रस्तावर अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची प्रक्रिया (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) करणे धोकादायक ठरेल, असा वैद्यकीय यंत्रणांचा निष्कर्ष. मात्र आटणाऱ्या रक्ताने हतबल झालेला थॅलेसेमियाग्रस्त जिद्दीला पेटलेला. अखेर नाशकातील डॉक्टरांनी धोक्याची जाणीव करुन देत रुग्णाच्या मोठ्या भावाच्या २२ प्रकारच्या रक्तचाचण्या करुन यशस्वी प्रत्यारोपण केले. वयाच्या २४ व्या वर्षी झालेली ही प्रक्रिया  थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये नवी उमेद देणारी ठरली आहे.

हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या  वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता.

५ वर्षांआतील रुग्णांसाठी या प्रक्रियेचा यशस्वी दर ७० ते ८० टक्के तर तारुण्यातील दर २५ टक्के इतका आहे. गेल्या २२ वर्षात या वयातल्या रुग्णावर पहिल्यांदाच प्रत्यारोपण केले. यापूर्वी राज्यात या वयातल्या रुग्णावर दोन ते तीन यशस्वी प्रक्रिया यापूर्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

-डॉ. प्रीतेश जुनागडे, रक्तशास्त्र तज्ज्ञ, नाशिक.