शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कपाशीवर बोंड अळीचेही आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 17:17 IST

दुष्काळात तेरावा महिना : विहिरी व नाले कोरडेच

लोकमत न्यूज नेटवर्कमहिंदळे, ता. भडगाव: परिसरावर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आभाळमाया दमदार बरसलीच नाही. परिसरात पावसाची सुरुवातच तुरळक झाली. त्यामुळे पेरणीही उशिरा झाली. काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी कपाशी लागवड केली होती. पिकेही जोमदार होती. परंतु अचानक परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले व माल पक्व होण्याच्या काळातच कपाशी लाल पडायला लागली आहे. या लाल्या व बोंड अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखे झाले आहे. कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.शेतकºयांनी पिकांसाठी मोठा खर्च केला आहे. परंतु कपाशीच्या माल पक्व होण्यास सुरुवात होत असतांना वातावरणाच्या बदलामुळे कपाशी पिकावर बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव होत फुल पाती गडून पडली आहेत. परिणामी झाडांवर फुलपाती कमी व पानेच जास्त दिसत आहेत. आता अचानक उन्हाची तीव्रता व वातावरणात बदल झाल्यामुळे कपाशी पिके लाल पडण्यास सुरुवात झाली आहे.झाडावर पाहिजे तेवढा माल पक्व झाला नसल्यामुळे अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी पार खचला आहे. पिकांसाठी केलेला खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.परिसरात पावसाळा संपण्याच्या मार्गांवर आहे. पण अजूनही दमदार पाऊस आलाच नाही. त्यामुळे परिसरातील पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे.परंतु विहिरीत पाण्याचा साठाच नसल्यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे या विवनचनेत शेतकरी सापडला आहे.