शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपमध्ये ‘नवा भिडू -नवा राज ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 18:26 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळात न झालेला समावेश आणि त्यांनी लगेच केलेली बोचरी टीका लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी खान्देशातील नेतृत्वातील बदलावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. तसे तीन वर्षांपासून हळूहळू सत्तेचा केंद्रबिंदू सरकत होता. पण इतक्या झपाट्याने असे होईल, याची अपेक्षा नव्हती. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या दमदार पुनरागमनानंतर अडवाणी-जोशी, सुमित्रा महाजन यांचा न्याय लावत खडसे यांना ‘ज्येष्ठ नेत्यां’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्रिकुटाला तिकीट दिले नाही तर खडसेंना मंत्रिपदापासून वंचित ठेवले.

ठळक मुद्देएकनाथराव खडसे यांच्या नाराजीकडे पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष ; अडवाणी-जोशींच्या न्यायाने ज्येष्ठतेवर शिक्कामोर्तबखान्देशातील नेतृत्वाची कूस बदलली ; गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांच्याकडे पक्षीय नेतृत्वाची धुरा

मिलिंद कुलकर्णी२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर महाराष्टÑातील तिकीट वाटप खडसे यांनी केले होते. आता याच भूमिकेत गिरीश महाजन आले आहेत. यशोशिखर निसरडे असते आणि त्यावर दावा करणारे अनेक असतात, ते लगेच जागा भरुन काढतात असे जे चिंतनसूत्र आहे, त्याचा प्रत्यय अशावेळी येतो. भाजप आता अधिक तरुण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची टीम आता निवडली आहे, त्या टीमसोबत ते विश्वासाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.भाजपमधील नेतृत्वाने कूस बदलली आहे. एकनाथराव खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन हे आता खान्देशचे एकमुखी नेतृत्व झाले आहे. खडसे वगळता त्यांना आता कोणीही प्रमुख प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. खडसे यांच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याने आता महाजन यांची ‘बुलेट ट्रेन’ अधिक सुसाट धावेल, असे म्हणता येईल.खान्देशाला सक्षम, सबळ नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. नंदुरबारमध्ये सुरुपसिंग नाईक, धुळ्यात रोहिदास पाटील, अमरीषभाई पटेल, जळगावात मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, प्रतिभाताई पाटील, के.एम.बापू पाटील, सुरेशदादा जैन, ईश्वरलाल जैन या मूळ काँग्रेसी विचारसरणीच्या मंडळींचा मोठा दबदबा होता. अनेक वर्षे या नेत्यांनी मंत्रिमंडळ आणि पक्षसंघटनेत ठसा उमटविला.काँग्रेस पक्षाची अनेकदा शकले उडाली. नेते विखुरले. कधी पुन्हा एकत्र आले तर कधी पुन्हा स्वतंत्र झाले. पक्षाची ताकद कमी झाली आणि नेत्यांना हेवेदावे भोवले. त्याच काळात एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व भाजपमध्ये उदयास आले. संघटनकौशल्य, फर्डे वक्ते, अभ्यासू वृत्ती, विधिमंडळाच्या आयुधांची जाण आणि प्रशासकीय यंत्रणेवरील पकड या गुणांमुळे खडसे यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेले सख्य, भाजपने बहुजन नेतृत्वाला दिलेली संधी यातून खडसेंची दमदार वाटचाल सुरु झाली. युती सरकारच्या पहिल्या काळात वजनदार खाती त्यांच्याकडे होती. २००९ ते १४ या काळात विरोधी पक्षनेतेपद आल्याने खडसे हे महाराष्टÑ पातळीवरील नेते बनले.नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये पारंपरिक राजकारणाऐवजी रणनीतीवर भर देण्यात सुरुवात झाली. ‘नवा भिडू-नवा राज’ हे तत्त्व चलनात आले आणि खडसे यांचे ज्येष्ठत्व डावलत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. महसूल, कृषीसारखी १२ खाती देऊनही खडसे हे समाधानी नव्हते. पंढरपूर असो की, मुक्ताईनगर ते नाराजी बोलून दाखवत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने खडसे यांचा मोठा पाठीराखा हरपला. सत्तासुंदरीपुढे भल्याभल्यांची मती फिरते असे म्हणतात. तसा अनुभव खडसे यांना आला. ज्यांना आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी केले, त्यांनी संकटकाळात समर्थन करण्याऐवजी पाठ फिरवली आणि खडसे एकाकी पडू लागले. पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांना बळ दिले आणि महाजन यांनीही कौशल्याने पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले. तरुण नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधून उत्तर महाराष्टÑाचे नेते म्हणून स्वत:ला सिध्द करुन दाखविल्याने महाजन यांनी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास संपादन केला.

टॅग्स :Politicsराजकारण