शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

भाजपमध्ये ‘नवा भिडू -नवा राज ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 18:26 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळात न झालेला समावेश आणि त्यांनी लगेच केलेली बोचरी टीका लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी खान्देशातील नेतृत्वातील बदलावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. तसे तीन वर्षांपासून हळूहळू सत्तेचा केंद्रबिंदू सरकत होता. पण इतक्या झपाट्याने असे होईल, याची अपेक्षा नव्हती. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या दमदार पुनरागमनानंतर अडवाणी-जोशी, सुमित्रा महाजन यांचा न्याय लावत खडसे यांना ‘ज्येष्ठ नेत्यां’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्रिकुटाला तिकीट दिले नाही तर खडसेंना मंत्रिपदापासून वंचित ठेवले.

ठळक मुद्देएकनाथराव खडसे यांच्या नाराजीकडे पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष ; अडवाणी-जोशींच्या न्यायाने ज्येष्ठतेवर शिक्कामोर्तबखान्देशातील नेतृत्वाची कूस बदलली ; गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांच्याकडे पक्षीय नेतृत्वाची धुरा

मिलिंद कुलकर्णी२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर महाराष्टÑातील तिकीट वाटप खडसे यांनी केले होते. आता याच भूमिकेत गिरीश महाजन आले आहेत. यशोशिखर निसरडे असते आणि त्यावर दावा करणारे अनेक असतात, ते लगेच जागा भरुन काढतात असे जे चिंतनसूत्र आहे, त्याचा प्रत्यय अशावेळी येतो. भाजप आता अधिक तरुण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची टीम आता निवडली आहे, त्या टीमसोबत ते विश्वासाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.भाजपमधील नेतृत्वाने कूस बदलली आहे. एकनाथराव खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन हे आता खान्देशचे एकमुखी नेतृत्व झाले आहे. खडसे वगळता त्यांना आता कोणीही प्रमुख प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. खडसे यांच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याने आता महाजन यांची ‘बुलेट ट्रेन’ अधिक सुसाट धावेल, असे म्हणता येईल.खान्देशाला सक्षम, सबळ नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. नंदुरबारमध्ये सुरुपसिंग नाईक, धुळ्यात रोहिदास पाटील, अमरीषभाई पटेल, जळगावात मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, प्रतिभाताई पाटील, के.एम.बापू पाटील, सुरेशदादा जैन, ईश्वरलाल जैन या मूळ काँग्रेसी विचारसरणीच्या मंडळींचा मोठा दबदबा होता. अनेक वर्षे या नेत्यांनी मंत्रिमंडळ आणि पक्षसंघटनेत ठसा उमटविला.काँग्रेस पक्षाची अनेकदा शकले उडाली. नेते विखुरले. कधी पुन्हा एकत्र आले तर कधी पुन्हा स्वतंत्र झाले. पक्षाची ताकद कमी झाली आणि नेत्यांना हेवेदावे भोवले. त्याच काळात एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व भाजपमध्ये उदयास आले. संघटनकौशल्य, फर्डे वक्ते, अभ्यासू वृत्ती, विधिमंडळाच्या आयुधांची जाण आणि प्रशासकीय यंत्रणेवरील पकड या गुणांमुळे खडसे यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेले सख्य, भाजपने बहुजन नेतृत्वाला दिलेली संधी यातून खडसेंची दमदार वाटचाल सुरु झाली. युती सरकारच्या पहिल्या काळात वजनदार खाती त्यांच्याकडे होती. २००९ ते १४ या काळात विरोधी पक्षनेतेपद आल्याने खडसे हे महाराष्टÑ पातळीवरील नेते बनले.नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये पारंपरिक राजकारणाऐवजी रणनीतीवर भर देण्यात सुरुवात झाली. ‘नवा भिडू-नवा राज’ हे तत्त्व चलनात आले आणि खडसे यांचे ज्येष्ठत्व डावलत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. महसूल, कृषीसारखी १२ खाती देऊनही खडसे हे समाधानी नव्हते. पंढरपूर असो की, मुक्ताईनगर ते नाराजी बोलून दाखवत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने खडसे यांचा मोठा पाठीराखा हरपला. सत्तासुंदरीपुढे भल्याभल्यांची मती फिरते असे म्हणतात. तसा अनुभव खडसे यांना आला. ज्यांना आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी केले, त्यांनी संकटकाळात समर्थन करण्याऐवजी पाठ फिरवली आणि खडसे एकाकी पडू लागले. पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांना बळ दिले आणि महाजन यांनीही कौशल्याने पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले. तरुण नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधून उत्तर महाराष्टÑाचे नेते म्हणून स्वत:ला सिध्द करुन दाखविल्याने महाजन यांनी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास संपादन केला.

टॅग्स :Politicsराजकारण