शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भाजपाच्या मदतीसाठी संघ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 11:40 IST

सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले सरकारचे कौतुक

ठळक मुद्देजनजाती मेळाव्याचे आयोजन

जळगाव- जिल्ह्यातील धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जनजाती मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भाजपा सरकारला संवेदनशील सरकार असे म्हणत सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. यामुळे संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून भाजपाला एक प्रकारे बळच देण्यात आले. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीला संघ मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.भैय्याजी जोशी हे संघात क्रमांक दोनचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे केलेल्या या कौतुकात गुपितही दडले आहे. सोबत अ.भा.धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, रा.स्व.संघाचे क्षेत्रप्रमुख बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.क्रांतीकारक खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेतर्फे आयोजित या मेळाव्यास भैय्याजी जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जोशी यांनी या सरकारने सर्वच योजनांचा लाभ हा तळागाळापर्यंत पोहचवला असल्याने हे आदर्श सरकार असल्याचे सांगत पाठराखण केली.जोशी यांनी क्रांतीकारक खाज्याजी नाईक यांच्या स्वातंत्र लढ्यातील कामगिरीचा तसेच बलिदानाचा उल्लेख केला. एवढेच नाही तर आदिवासी क्रांतीकारकांची तसेच आदिवासींची कामगिरीही स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय असल्याचे सांगत आपण सर्व मूळ आदिवासीच असल्याचा दाखला दिला. त्यामुळे आदिवासी समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून संघाने केला आहे.खाज्याजी नाईक स्मारकाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १५ कोटीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धरणगाव येथील जनजाती मेळाव्यात केली.

टॅग्स :Politicsराजकारण