शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ‘देर आए दुरुस्त आए’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली ...

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. मात्र, एकवेळ अशी होती की, रुग्णालय व जिल्हा प्रशासनावर ऑक्सिजन किती तास पुरेल? व ऑक्सिजनचे टँकर किती वेळात पोहोचतील यासाठी घड्याळाचे काटे मोजावे लागत होते. त्यावेळी राज्यस्तरावरच भाजपची केवळ विरोधाची व टीका करण्याचीच भूमिका दिसून येत होती. मात्र, नंतर या भूमिकेत बदल झालेला दिसून आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी एक ऑक्सिजन टँकर मागविला. तसेच त्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच पाच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करून कार्यादेशही दिले आहेत. त्या प्रकल्पांची मशिनरी लवकरच दाखल होऊन ते प्रकल्प संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीच कार्यरत होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपकडून आणखी पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आलेच तर ते जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने फायदेशीरच ठरणार आहेत. आता रविवारी भाजपतर्फे आणखी एक ऑक्सिजन टँकर मागवून जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये तो ऑक्सिजन भरण्यात आला. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ३६८ बेड असून, सध्या त्यात २२० रुग्ण आहेत. म्हणजेच तब्बल १४८ ऑक्सिजनचे बेड आता जिल्हा रुग्णालयातच रिक्त आहेत. इतर खासगी रुग्णालयातही आता अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे मागविण्यात येत असलेला ऑक्सिजन पुरेसा ठरत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेची मार्चअखेर व एप्रिल महिन्यात जेव्हा तीव्रता होती, तेव्हा ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरच्या बेडची, रेमडेसिविरची कमतरता भासत होती. कुठे बेड मिळेल याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला हेल्पलाईन सुरू करावी लागली होती. त्यावेळी भाजपच काय, तर कुठल्याच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पुढे येऊन नागरिकांची मदत करताना दिसले नाहीत. नंतर हळूहळू काहींनी मदतीचा हात पुढे केला. भाजप तर सुरुवातीला केवळ विरोधासाठी विरोधाची भूमिका घेत राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची संधी त्यांनी गमावली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याने त्यांचा राग या सरकारवर निघेल, अशी काहीशी समीकरणे बांधत केवळ बघ्याची भूमिका घेत टीका करण्याचे सत्र सुरू होते. मात्र, त्यामुळे नागरिकांचा भाजपवर रोष ओढावला जात आहे, हे लक्षात यायला भाजपच्या नेत्यांना थोडा वेळ लागला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे सत्र सुरू झाले. प्रत्यक्ष लोकांना मदत करण्यासाठी भाजपनेही हेल्पलाईन सुरू केली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आता तर ऑक्सिजनची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. असे असताना रविवारी भाजपने एक ऑक्सिजन टँकर स्वखर्चाने मागवून तो ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आला. लोकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देऊन त्यांची सहानुभूती मिळविण्याची संधी गमावलेल्या भाजपने हे सुरू केलेले प्रयत्न म्हणजे ‘देर आए दुरुस्त आए...’ असेच म्हणावे लागेल. दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिद्धता ठेवावी यासाठी भाजपनेही आतापासून पाठपुरावा करून त्यात सक्रिय सहभाग नोंदविला तर नागरिकांनाही ते निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.