शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

भाजपचे ‘देर आए दुरुस्त आए’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली ...

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. मात्र, एकवेळ अशी होती की, रुग्णालय व जिल्हा प्रशासनावर ऑक्सिजन किती तास पुरेल? व ऑक्सिजनचे टँकर किती वेळात पोहोचतील यासाठी घड्याळाचे काटे मोजावे लागत होते. त्यावेळी राज्यस्तरावरच भाजपची केवळ विरोधाची व टीका करण्याचीच भूमिका दिसून येत होती. मात्र, नंतर या भूमिकेत बदल झालेला दिसून आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी एक ऑक्सिजन टँकर मागविला. तसेच त्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच पाच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करून कार्यादेशही दिले आहेत. त्या प्रकल्पांची मशिनरी लवकरच दाखल होऊन ते प्रकल्प संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीच कार्यरत होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपकडून आणखी पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आलेच तर ते जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने फायदेशीरच ठरणार आहेत. आता रविवारी भाजपतर्फे आणखी एक ऑक्सिजन टँकर मागवून जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये तो ऑक्सिजन भरण्यात आला. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ३६८ बेड असून, सध्या त्यात २२० रुग्ण आहेत. म्हणजेच तब्बल १४८ ऑक्सिजनचे बेड आता जिल्हा रुग्णालयातच रिक्त आहेत. इतर खासगी रुग्णालयातही आता अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे मागविण्यात येत असलेला ऑक्सिजन पुरेसा ठरत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेची मार्चअखेर व एप्रिल महिन्यात जेव्हा तीव्रता होती, तेव्हा ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरच्या बेडची, रेमडेसिविरची कमतरता भासत होती. कुठे बेड मिळेल याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला हेल्पलाईन सुरू करावी लागली होती. त्यावेळी भाजपच काय, तर कुठल्याच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पुढे येऊन नागरिकांची मदत करताना दिसले नाहीत. नंतर हळूहळू काहींनी मदतीचा हात पुढे केला. भाजप तर सुरुवातीला केवळ विरोधासाठी विरोधाची भूमिका घेत राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची संधी त्यांनी गमावली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याने त्यांचा राग या सरकारवर निघेल, अशी काहीशी समीकरणे बांधत केवळ बघ्याची भूमिका घेत टीका करण्याचे सत्र सुरू होते. मात्र, त्यामुळे नागरिकांचा भाजपवर रोष ओढावला जात आहे, हे लक्षात यायला भाजपच्या नेत्यांना थोडा वेळ लागला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे सत्र सुरू झाले. प्रत्यक्ष लोकांना मदत करण्यासाठी भाजपनेही हेल्पलाईन सुरू केली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आता तर ऑक्सिजनची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. असे असताना रविवारी भाजपने एक ऑक्सिजन टँकर स्वखर्चाने मागवून तो ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आला. लोकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देऊन त्यांची सहानुभूती मिळविण्याची संधी गमावलेल्या भाजपने हे सुरू केलेले प्रयत्न म्हणजे ‘देर आए दुरुस्त आए...’ असेच म्हणावे लागेल. दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिद्धता ठेवावी यासाठी भाजपनेही आतापासून पाठपुरावा करून त्यात सक्रिय सहभाग नोंदविला तर नागरिकांनाही ते निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.