शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘योग्य वेळ’ एकनाथराव खडसेंनी ठोकरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:02 IST

जळगावात नाराजी व्यक्त होताच गुंडाळली पत्रपरिषद

ठळक मुद्देदानवे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर खडसेंना न्याय मिळेलखडसे म्हणाले, तशी योग्य वेळ येणारच नाही

जळगाव- मनपा निवडणुकीनिमित्त आयोजित भाजपाच्या पत्रपरिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, योग्य वेळ आल्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना नक्कीच न्याय दिला जाईल. परंतु दानवे यांच्या या उत्तरानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांंनी लगेच सांगितले की, तशी योग्य वेळ येणारच नाही... खडसे यांच्या वक्तव्यातून जाहीरपणे नाराजी व्यक्त झाल्याने पत्रपरिषद आटोपती घेण्यात आली.शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीत दानवे यांच्या हस्ते भाजपाच्या मनपा निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशनही झाले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची मुख्य उपस्थिती होती.याचबरोबर सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु आहे का? असे विचारले असता दानवे यांनी असे कोणतेही वारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. तर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल अशीही चर्चा असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यावर या प्रश्नांची उत्तरे देणे मी जरुरी समजत नाही, असे सांगून दानवे यांनी पत्रपरिषद गुंडाळली.तत्पूर्वी खडसे समर्थकांनी दानवे यांना खडसे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना घेरले. त्यांचे म्हणणे दानवे यांनी समजून घेतले.खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपानंतर भाजपाने त्यांना मंत्रीपदावरुन दूर केले. दरम्यानच्या काळात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो आणि चौकशी समितीचीही क्लीन चिट खडसे यांना मिळाली. यानंतरही मात्र खडसे यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. पक्षातर्फे नेहमीच सांगण्यात आले की, योग्य वेळी खडसेंना संधी दिली जाईल.. न्याय दिला जाईल... परंतु न्याय मिळालाच नाही. आणि आजही तेच उत्तर मिळाल्याने खडसे यांनी नाराजीने ‘ती’ वेळ कधीच येणार नाही, असे स्पष्टपणे पत्र परिषदेतच वक्तव्य केले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव