शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:00 IST

जळगाव जिल्ह्यातील चित्र; गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचे रंग खुलणार

चुडामण बोरसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात नेतृत्वाची कूस बदलली आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन तर शिवसेनेमध्ये सुरेशदादा जैन यांच्याऐवजी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘युती’ भक्कम राहिल्याने विधानसभेत तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. जळगावसह एक-दोन जागांवर कुरबुरी वाढल्या तरी पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव हे मतदार संघ भाजपकडे तर जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे तर अमळनेर अपक्ष आणि राष्टÑवादी काँग्रेसकडे एकमेव एरंडोल मतदार संघ आहे.विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. युती होईल की नाही, याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. युती झाली तरी अडचणी आहेत. युतीतच जास्त बंडखोरीची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे सन २००९ मध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्याठिकाणी सन २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप हे मतदार संघ आता युती झाल्यास सहजासहजी सोडेल, अशी शक्यता कमीच आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जळगाव आणि भुसावळ मतदार संघाचे घेता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी जाहीर करुन खळबळ माजविली आहे. पूर्वीच्या जळगाव मतदार संघातून सुरेशदादा जैन हे नऊ वेळा निवडून आले आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळी ते शहरात नसल्याने प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते. यावेळी ते स्वत: शहरात आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन हे सांगतील त्यालाच विधानसभेचे तिकिट मिळेल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ते घेतील, हे निश्नित. जामनेरात तर अनेक प्रतिस्पर्धी त्यांनी भाजपात आणले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात विरोध असा राहिलेला नाही.मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांनाही कुणी आव्हान देईल, अशी स्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने त्यांना जोरदार टक्कर दिली होती. पण मध्यंतरीच्या काळात विरोधक ढेपाळले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा खडसे यांना सहज होईल, अशी स्थिती आहे.जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीची अवस्था बिकट आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. तर २००९ च्या निवडणुकीत ५ आमदार निवडून आलेल्या राष्टÑवादीला २०१४ मध्ये जेमतेम एक जागा मिळाली. राष्टÑवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे.वंचित बहुजन आघाडीही आक्रमकपणे पुढे येत आहे. आघाडीचे पॉकेट्स असलेल्या भुसावळ व रावेरमधून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वंचित काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास त्यांना कुठली जागा सोडायची हा ही एक प्रश्नच राहील.

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील खासदार झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे युतीच्यावतीने येथे सर्वात जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे पर्यायाने बंडखोरीची भीती इथेच जास्त आहे. यातून भाजपला दगाफटका होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे इच्छुकांना सांभाळताना युतीला मोठीच कसरत करावी लागणार आहे.भाजप, राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षच नाहीसध्याच्या स्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अजूनही कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सध्या तरी जिल्हाध्यक्ष नाहीत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा