शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:00 IST

जळगाव जिल्ह्यातील चित्र; गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचे रंग खुलणार

चुडामण बोरसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात नेतृत्वाची कूस बदलली आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन तर शिवसेनेमध्ये सुरेशदादा जैन यांच्याऐवजी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘युती’ भक्कम राहिल्याने विधानसभेत तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. जळगावसह एक-दोन जागांवर कुरबुरी वाढल्या तरी पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव हे मतदार संघ भाजपकडे तर जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे तर अमळनेर अपक्ष आणि राष्टÑवादी काँग्रेसकडे एकमेव एरंडोल मतदार संघ आहे.विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. युती होईल की नाही, याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. युती झाली तरी अडचणी आहेत. युतीतच जास्त बंडखोरीची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे सन २००९ मध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्याठिकाणी सन २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप हे मतदार संघ आता युती झाल्यास सहजासहजी सोडेल, अशी शक्यता कमीच आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जळगाव आणि भुसावळ मतदार संघाचे घेता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी जाहीर करुन खळबळ माजविली आहे. पूर्वीच्या जळगाव मतदार संघातून सुरेशदादा जैन हे नऊ वेळा निवडून आले आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळी ते शहरात नसल्याने प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते. यावेळी ते स्वत: शहरात आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन हे सांगतील त्यालाच विधानसभेचे तिकिट मिळेल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ते घेतील, हे निश्नित. जामनेरात तर अनेक प्रतिस्पर्धी त्यांनी भाजपात आणले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात विरोध असा राहिलेला नाही.मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांनाही कुणी आव्हान देईल, अशी स्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने त्यांना जोरदार टक्कर दिली होती. पण मध्यंतरीच्या काळात विरोधक ढेपाळले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा खडसे यांना सहज होईल, अशी स्थिती आहे.जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीची अवस्था बिकट आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. तर २००९ च्या निवडणुकीत ५ आमदार निवडून आलेल्या राष्टÑवादीला २०१४ मध्ये जेमतेम एक जागा मिळाली. राष्टÑवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे.वंचित बहुजन आघाडीही आक्रमकपणे पुढे येत आहे. आघाडीचे पॉकेट्स असलेल्या भुसावळ व रावेरमधून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वंचित काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास त्यांना कुठली जागा सोडायची हा ही एक प्रश्नच राहील.

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील खासदार झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे युतीच्यावतीने येथे सर्वात जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे पर्यायाने बंडखोरीची भीती इथेच जास्त आहे. यातून भाजपला दगाफटका होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे इच्छुकांना सांभाळताना युतीला मोठीच कसरत करावी लागणार आहे.भाजप, राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षच नाहीसध्याच्या स्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अजूनही कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सध्या तरी जिल्हाध्यक्ष नाहीत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा