शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:03 IST

विश्लेषण

सचिन देवजळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपाची गल्ली ते दिल्ली सत्ता असून यंदाही पुन्हा केंद्रात भाजपाचेच सरकार विराजमान झाले आहे. असे असतानांही महिनाभरापासून ट्रू जेटला ईसीजी परवानगी मिळत नसल्याने, जिल्ह्यातील सत्तेत असलेले नेते, अपयशी असल्याचे दिसून येत आहे.ुउड्डाण योजने अंतर्गंत एअर डेक्कनने सुरु केलेली विमानसेवा वर्षभरातच बंद पडली. त्यानंतर वर्षभरानंतर हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीने सेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. १७ जुलैचा कंपनीने मुहूर्तदेखील निश्चित केला होता. मात्र, ईजीसीची (केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय) याची ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली आहे. दुसरे म्हणजे अहमदाबाद विमानतळावरही ह्यस्लॉट ह्णमिळालेला नाही. ही सेवा सुरु होण्यासाठी कंपनीतर्फे गेल्या महिना भरापासून ईजीसीकडे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.ट्रू जेटला तिकीट विक्रीची परवानगी मिळण्यासाठी गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनीदेखील संसदेच्या आधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. मात्र, आठवडा उलटुनही उन्मेश पाटील यांच्या लक्षवेधीला केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने मनावर घेतलेले दिसून आले नाही. विशेष म्हणजे उड्डाण योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजने अंतर्गंत नाशिक, नांदेड व कोल्हापुरची विमानसेवा सुरु झाली असून, फक्त जळगावचीच विमानसेवा रखडली आहे.या सेवेसंदर्भात तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जळगावची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत आहेत. गेल्याच महिन्यात गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळाची पाहणी करुन, लवकरच सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटुनही भाजपाच्या नेत्यांना ईजीसीकडून ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी मिळण्याबाबत विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांनाच ईजीसीची परवानगी मिळत नसेल, तर ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कशी मिळणार?विमानसेवा पुन्हा सेवा झाल्यावर जळगावला दळवळणची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे रोजगाराच्या संधी उलब्ध होणार आहे. याची जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना जाण आहे. मग, ईजीसीकडून परवानगी मिळण्यासाठी संसदेत लक्षवेधी मांडूनही, त्यांना उपयश का येत आहे..जर सत्तेत असुनही, सेवा सुरु करण्यासाठी विलंब लागत असेल तर, भाजपाचे नेते सत्तेत असुनही, अपयशी आहेत..असे प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव