शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:03 IST

विश्लेषण

सचिन देवजळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपाची गल्ली ते दिल्ली सत्ता असून यंदाही पुन्हा केंद्रात भाजपाचेच सरकार विराजमान झाले आहे. असे असतानांही महिनाभरापासून ट्रू जेटला ईसीजी परवानगी मिळत नसल्याने, जिल्ह्यातील सत्तेत असलेले नेते, अपयशी असल्याचे दिसून येत आहे.ुउड्डाण योजने अंतर्गंत एअर डेक्कनने सुरु केलेली विमानसेवा वर्षभरातच बंद पडली. त्यानंतर वर्षभरानंतर हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीने सेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. १७ जुलैचा कंपनीने मुहूर्तदेखील निश्चित केला होता. मात्र, ईजीसीची (केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय) याची ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली आहे. दुसरे म्हणजे अहमदाबाद विमानतळावरही ह्यस्लॉट ह्णमिळालेला नाही. ही सेवा सुरु होण्यासाठी कंपनीतर्फे गेल्या महिना भरापासून ईजीसीकडे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.ट्रू जेटला तिकीट विक्रीची परवानगी मिळण्यासाठी गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनीदेखील संसदेच्या आधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. मात्र, आठवडा उलटुनही उन्मेश पाटील यांच्या लक्षवेधीला केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने मनावर घेतलेले दिसून आले नाही. विशेष म्हणजे उड्डाण योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजने अंतर्गंत नाशिक, नांदेड व कोल्हापुरची विमानसेवा सुरु झाली असून, फक्त जळगावचीच विमानसेवा रखडली आहे.या सेवेसंदर्भात तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जळगावची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत आहेत. गेल्याच महिन्यात गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळाची पाहणी करुन, लवकरच सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटुनही भाजपाच्या नेत्यांना ईजीसीकडून ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी मिळण्याबाबत विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांनाच ईजीसीची परवानगी मिळत नसेल, तर ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कशी मिळणार?विमानसेवा पुन्हा सेवा झाल्यावर जळगावला दळवळणची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे रोजगाराच्या संधी उलब्ध होणार आहे. याची जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना जाण आहे. मग, ईजीसीकडून परवानगी मिळण्यासाठी संसदेत लक्षवेधी मांडूनही, त्यांना उपयश का येत आहे..जर सत्तेत असुनही, सेवा सुरु करण्यासाठी विलंब लागत असेल तर, भाजपाचे नेते सत्तेत असुनही, अपयशी आहेत..असे प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव