शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:03 IST

विश्लेषण

सचिन देवजळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपाची गल्ली ते दिल्ली सत्ता असून यंदाही पुन्हा केंद्रात भाजपाचेच सरकार विराजमान झाले आहे. असे असतानांही महिनाभरापासून ट्रू जेटला ईसीजी परवानगी मिळत नसल्याने, जिल्ह्यातील सत्तेत असलेले नेते, अपयशी असल्याचे दिसून येत आहे.ुउड्डाण योजने अंतर्गंत एअर डेक्कनने सुरु केलेली विमानसेवा वर्षभरातच बंद पडली. त्यानंतर वर्षभरानंतर हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीने सेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. १७ जुलैचा कंपनीने मुहूर्तदेखील निश्चित केला होता. मात्र, ईजीसीची (केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय) याची ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली आहे. दुसरे म्हणजे अहमदाबाद विमानतळावरही ह्यस्लॉट ह्णमिळालेला नाही. ही सेवा सुरु होण्यासाठी कंपनीतर्फे गेल्या महिना भरापासून ईजीसीकडे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.ट्रू जेटला तिकीट विक्रीची परवानगी मिळण्यासाठी गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनीदेखील संसदेच्या आधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. मात्र, आठवडा उलटुनही उन्मेश पाटील यांच्या लक्षवेधीला केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने मनावर घेतलेले दिसून आले नाही. विशेष म्हणजे उड्डाण योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजने अंतर्गंत नाशिक, नांदेड व कोल्हापुरची विमानसेवा सुरु झाली असून, फक्त जळगावचीच विमानसेवा रखडली आहे.या सेवेसंदर्भात तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जळगावची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत आहेत. गेल्याच महिन्यात गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळाची पाहणी करुन, लवकरच सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटुनही भाजपाच्या नेत्यांना ईजीसीकडून ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी मिळण्याबाबत विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांनाच ईजीसीची परवानगी मिळत नसेल, तर ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कशी मिळणार?विमानसेवा पुन्हा सेवा झाल्यावर जळगावला दळवळणची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे रोजगाराच्या संधी उलब्ध होणार आहे. याची जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना जाण आहे. मग, ईजीसीकडून परवानगी मिळण्यासाठी संसदेत लक्षवेधी मांडूनही, त्यांना उपयश का येत आहे..जर सत्तेत असुनही, सेवा सुरु करण्यासाठी विलंब लागत असेल तर, भाजपाचे नेते सत्तेत असुनही, अपयशी आहेत..असे प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव