शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

जळगावकरांना भाजपकडून पुन्हा ‘गाजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:20 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा ...

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आता पुन्हा आमदार सुरेश भोळे यांनी पुन्हा आकड्यांचा खेळ दाखवित वर्षभरात शहराचा चेहरा बदलविण्याचे गाजर दाखविले आहे.‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण?’ या विषयावरील चर्चासत्राच्या दुसऱ्या भागाचे आयोजन शनिवार ३ रोजी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहरवासीयांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या त्रासाचे खापर मनपावर फोडले. या सोबतच वाहतूक शाखेच्या कारभारामुळे अपघात होत असल्याचाही आरोप करण्यात आला.गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी झालेल्या चर्चासत्रात शहरातील विकास कामांसाठी मिळालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ८९१ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी या विकास कामांची कालमर्यादा सांगत वर्षभरात सर्व कामे मार्गी लागून शहराचा चेहरामोहरा बदललेला असेल आश्वासन दिले. असे असले तरी गेल्या वर्षभरात अमृत योजना, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण,साफसफाईचा ठेका,हुडकोकर्ज,गाळेप्रश्न असे अनेक प्रश्न कायम आहे. त्यामुळे आताही या आश्वासनावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अमृत योजनेचे काम झाल्यानंतर शहरात भूमीगत गटारींचे काम होऊन त्यानंतर रस्त्यांचे कामे होतील. यात भूमीगत गटारींच्या कामाचे भूमीपूजन आठ दिवसात होईल, असे आमदार म्हणाले. स्वच्छ भारत योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मिळाला असून त्यात खरेदी केलेल्या घंटागाड्या आठ दिवसात सुरू होतील व १५ दिवसात शहरात कोठेच कचरा दिसणार नाही, असेही ते म्हणाले. या सोबतच वर्ष-दीड वर्षात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, आठवडाभरात पोलीस निवासस्थानांचे भूमीपूजन करण्यासह एलईडी दिव्यांच्या समस्या पाहता मक्तेदारच बदलविणार असल्याचे ते म्हणाले. शहराचे सिंगापूर होईल असे नाही, मात्र येथील प्राथमिक गरजा तरी पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले. आमदार भोळे यांनी चर्चासत्रात अमृत योजना, भूमीगत गटारी, समांतर रस्ते व इतर कामांसाठी आणलेल्या निधीची आकडेवारी सांगितली. त्यावर आक्षेप घेत तफावत असल्याचा मुद्दा मांडला असता त्यावर प्रिंट मिस्टेक असल्याचे आमदार भोळे म्हणाले. ही सर्व आकडेवारी आपल्याकडे पुराव्यानिशी असून ती खोटी असल्यास आपण केव्हाही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हानही आमदारांनी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव