शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

एलईडी पथदिव्यांना तरतुदीचा अडसर!

By admin | Updated: December 6, 2015 00:18 IST

एलईडी पथदिवे बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 25 लाख रुपये खर्च येणार असल्याचा अहवाल ईईएसएल या कंपनीने मनपाला दिला आह़े

धुळे : महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी 35 लाख रुपयांची तरतूद केली होती़ मात्र एलईडी पथदिवे बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 25 लाख रुपये खर्च येणार असल्याचा अहवाल ईईएसएल या कंपनीने मनपाला दिला आह़े त्यामुळे या महिन्यात होणा:या सुधारित अंदाजपत्रकात एलईडी पथदिव्यांसाठी वाढीव तरतूद केली जाणार आह़े

शहरात एलईडी पथदिवे बसविल्यास मनपाला वीज बिलात मोठा लाभ होईल, हे जगजाहीर आह़े त्यामुळे मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षापासून एलईडी पथदिवे बसविण्याच्या हालचाली सुरू आहेत़ त्यानुसार मनपा प्रशासनाने केंद्र शासनाच्या एनर्जी एफिशिएंसी सव्र्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीकडून एलईडी पथदिव्यांबाबत माहिती मागविली होती़ त्यानुसार संबंधित कंपनीने मनपाला अहवाल सादर केला़ सदरचा अहवाल योग्य आहे किंवा नाही, यासाठी तो उपमुख्य लेखापरीक्षक माधव सराई यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता़ मनपाला पथदिव्यांवर दरमहा सरासरी 30 लाखांचा खर्च करावा लागतो़ परंतु जर एलईडी पथदिवे बसविले तर बिलात 50 टक्के बचत होऊ शकत़े शासनाच्या धोरणानुसार वीज बिलात बचत करणे क्रमप्राप्त असल्याने आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व हायमास्ट व पथदिवे बंद केले होत़े सध्या पथदिवे सुरू असले तरी हायमास्टवर एकच दिवा सुरू ठेवला जात आह़े मनपाने यापूर्वी दोन वेळा शासनाला प्रस्ताव सादर करून एलईडी पथदिव्यांसाठी निधीची मागणी केली होती. मात्र ते दोन्ही प्रस्ताव प्रलंबित आहेत़ स्थायी समितीत यापूर्वीच एलईडी पथदिव्यांबाबतचा ठराव करण्यात आला आह़े तेव्हापासून एलईडी पथदिव्यांबाबत ईईएसएल कंपनीशी मनपाचा सतत पत्रव्यवहार सुरू आह़े

दरम्यान लेखा विभागाने सदर प्रकल्प राबविण्यास हरकत नसली तरी त्यासाठी मनपाच्या 2015-16 च्या अंदाजपत्रकात तरतूद करावी लागेल, असे स्पष्ट केले आह़े मनपाने केवळ 35 लाखांची तरतूद केली असून प्रत्यक्ष खर्च मात्र 10 कोटी 25 लाख रुपये येणार आह़े त्यामुळे डिसेंबरमध्ये सादर होणा:या सुधारित अंदाजपत्रकात याबाबत वाढ करायची किंवा नाही, यावर अजून निर्णय झालेला नाही़ मात्र लेखा विभागाने अभिप्राय देताना एलईडी पथदिव्यांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेऊन अन्य प्रक्रिया पूर्ण करावी, असेही लेखा विभागाने स्पष्ट केले आह़े

त्यामुळे वाढीव तरतूद झाल्यास हा प्रस्ताव मार्गी लागेल, अन्यथा रखडण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता मनपा आयुक्त यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल़ उपमुख्य लेखापरीक्षक माधव सराई हे अभिप्राय आयुक्तांना सादर करणार असून त्यानंतर आयुक्तांकडूनच याबाबत निर्णय घेतला जाणार आह़े शिवाय शासनाच्या ऊर्जा व अपारंपरिक विभागाकडून अनुदान मिळविण्यासाठी देखील मनपा प्रशासन धडपड करणार आह़े