शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता - ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई - शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा ...

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता

- ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई

- शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा भरला होता हप्ता

- राज्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

- राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या एकूण रकमेच्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४५ टक्के मिळाली नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फटका बसत होता. त्यातच केळीला योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. मात्र, २०१९-२०२० या वर्षात हवामान फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे.

जिल्ह्यातील ५३ हजार उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हप्ते भरले होते. त्यात राज्य व केंद्र शासनानेदेखील आपलेही हप्ते भरून, शेतकऱ्यांना एकप्रकारे भरभक्कम आर्थिक मदत मिळवून दिली आहे. जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ३७५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीद्वारे अदा करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात एकूण ८०० कोटींची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल ३७५ कोटी म्हणजेच एकूण रकमेच्या ४५ टक्के रक्कम ही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून केळी पिकाला कंटाळलेले शेतकरी पुन्हा केळीची लागवड करू लागले आहेत.

थकीत २० कोटींची रक्कम झाली अदा

शेतकऱ्यांना गेल्यावर्षी फळपीक विमा योजनेअंतर्गत जास्त तापमान, कमी तापमान यामध्ये नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम तर मिळाली होती. त्यातच वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांनादेखील नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नव्हती मात्र गेल्या आठवड्यात उर्वरित पाच हजार शेतकऱ्यांनादेखील वीस कोटी रुपयांची अदायगी करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील राज्य व केंद्र शासनाकडे चांगलाच पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यावर्षी यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांनी याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील राज्य शासनाकडे पाठपुरावा करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरभक्कम नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त करून दिली आहे.

मात्र यावर्षी नुकसानभरपाईची रक्कम मिळणे कठीण?

गेल्यावर्षी शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाईची रक्कम मिळाली असली, तरी यावर्षी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम मिळणे कठीण आहे. फळपीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर ही लाभ मिळणे कठीण होणार आहे. याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनदेखील अद्यापही राज्य शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे केंद्र शासनाने याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून पुन्हा निविदा काढून निकष बदलण्याबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. केळी पीक विमा योजनेअंतर्गत निकषांमध्ये बदल केल्यामुळे या वर्षी केवळ २४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर गेल्या वर्षी तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला होता.