शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता - ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई - शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा ...

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता

- ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई

- शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा भरला होता हप्ता

- राज्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

- राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या एकूण रकमेच्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४५ टक्के मिळाली नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फटका बसत होता. त्यातच केळीला योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. मात्र, २०१९-२०२० या वर्षात हवामान फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे.

जिल्ह्यातील ५३ हजार उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हप्ते भरले होते. त्यात राज्य व केंद्र शासनानेदेखील आपलेही हप्ते भरून, शेतकऱ्यांना एकप्रकारे भरभक्कम आर्थिक मदत मिळवून दिली आहे. जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ३७५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीद्वारे अदा करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात एकूण ८०० कोटींची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल ३७५ कोटी म्हणजेच एकूण रकमेच्या ४५ टक्के रक्कम ही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून केळी पिकाला कंटाळलेले शेतकरी पुन्हा केळीची लागवड करू लागले आहेत.

थकीत २० कोटींची रक्कम झाली अदा

शेतकऱ्यांना गेल्यावर्षी फळपीक विमा योजनेअंतर्गत जास्त तापमान, कमी तापमान यामध्ये नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम तर मिळाली होती. त्यातच वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांनादेखील नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नव्हती मात्र गेल्या आठवड्यात उर्वरित पाच हजार शेतकऱ्यांनादेखील वीस कोटी रुपयांची अदायगी करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील राज्य व केंद्र शासनाकडे चांगलाच पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यावर्षी यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांनी याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील राज्य शासनाकडे पाठपुरावा करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरभक्कम नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त करून दिली आहे.

मात्र यावर्षी नुकसानभरपाईची रक्कम मिळणे कठीण?

गेल्यावर्षी शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाईची रक्कम मिळाली असली, तरी यावर्षी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम मिळणे कठीण आहे. फळपीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर ही लाभ मिळणे कठीण होणार आहे. याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनदेखील अद्यापही राज्य शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे केंद्र शासनाने याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून पुन्हा निविदा काढून निकष बदलण्याबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. केळी पीक विमा योजनेअंतर्गत निकषांमध्ये बदल केल्यामुळे या वर्षी केवळ २४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर गेल्या वर्षी तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला होता.