शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

अनलॉकमध्ये दुचाकी व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:52 IST

अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देमार्केट रिव्ह्यू रेल्वे, बसेस, कालीपिली, रिक्षा बंदचा परिणामअपडाऊन करणाऱ्यांचा दुचाकीकडे कल

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना लॉकडाऊनमध्ये मंदीच्या सावटाखाली गेलेले आॅटोमोबाईल क्षेत्र विशेषत: दुचाकी व्यवसाय कमालीचा मंदावला होता, मात्र अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला असून, दुचाकी व्यवसायात तेजी आली आहे.सुरुवातीला कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय जवळपास डबघाईला गेले होते. हळूहळू कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर यावे, अर्थचक्र फिरावे याकरिता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. शहरात आठवड्यातून तीन दिवस हे दुचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात दुचाकी विक्री होत नव्हती. मात्र आता पाच दिवसांचा आठवडा करताच दुचाकी व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. हमखास दररोज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कोरोना काळात वाहनांची विक्री होत आहे.कोरोनाचा दुचाकी विक्रेत्यांसाठी असाही सकारात्मक परिणामकोरोना संक्रमण समूहात पसरतो. गर्दी होऊ नये याकरिता शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा बंद केले किंवा त्यांच्यावर निर्बंध आणले. अर्थातच जे चाकरमान जळगाव, रावेर, चाळीसगाव, पाचोरा व अन्य ठिकाणी रेल्वेने, बसने अप-डाऊन करत होते त्यांची मदार आता दुचाकीवर आली किंवा त्यांना स्वत:च्या बचावासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागण ‘खत्रे से खाली नही’ म्हणून फायनान्स, इंस्टॉलमेंट ने का होईना चाकरमाने दुचाकीला खरेदीसाठी पसंती देत आहेत. कोरोना काळाय प्रशासनाने बंद केलेल्या प्रवासी वाहतूक सेवेचा सकारात्मक परिणाम दुचाकी विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे.शंभर ग्राहकातून ८० टक्के ग्राहकांकडून केली जाते खरेदीअनलॉकमध्ये भुसावळ शहरात मंगळवार व शनिवार 'जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात जो व्यवसाय सात दिवसात होत होता, तोच व्यवसाय आता पाच दिवसात होत आहे. शंभरपैकी ८० टक्के ग्राहक हे हमखास दुचाकी खरेदी करतात. त्याचं कारणही तसेच पूर्वी गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह मित्रमंडळी खरेदी करण्यासाठी येत होती व अनेक वेळा फक्त चौकशी करून निघून जायचे. मात्र आता ज्यांना दुचाकीची खरंच गरज आहे अशी मंडळी कुटुंबियांना सोबत न आणता एखाद दोन व्यक्ती येऊन शारीरिक अंतराचे भान ठेवून शहानिशा केल्यानंतर दुचाकी बुक करीत आहेत. पूर्वीच्या मानाने दुचाकी वाहन विक्रीत 'रियल खरीददार' खरेदीसाठी येत आहेत. उगाच कोरोनाची भीती असल्याने चौकशीसाठी कोणीही येत नसल्याचे दुचाकी विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दहावी-बारावीच्या निकालानंतर होते मोठी मागणीयंदा कोरोनामुळे उशिराने निकाल लागत असले तरी निकाल लागल्यानंतर आई-वडील, आप्तेष्ट पुढील शिक्षणासाठी व मुलांचा प्रोत्साहन वाढावे याकरिता हमखास दुचाकी घेऊन देतातच. यामुळेसुद्धा दुचाकी वाहनांची विक्री दहावी बारावीच्या निकालानंतर हमखास वाढते, असा अनुभव आहे.

टॅग्स :MarketबाजारBhusawalभुसावळ