शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अनलॉकमध्ये दुचाकी व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:52 IST

अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देमार्केट रिव्ह्यू रेल्वे, बसेस, कालीपिली, रिक्षा बंदचा परिणामअपडाऊन करणाऱ्यांचा दुचाकीकडे कल

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना लॉकडाऊनमध्ये मंदीच्या सावटाखाली गेलेले आॅटोमोबाईल क्षेत्र विशेषत: दुचाकी व्यवसाय कमालीचा मंदावला होता, मात्र अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला असून, दुचाकी व्यवसायात तेजी आली आहे.सुरुवातीला कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय जवळपास डबघाईला गेले होते. हळूहळू कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर यावे, अर्थचक्र फिरावे याकरिता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. शहरात आठवड्यातून तीन दिवस हे दुचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात दुचाकी विक्री होत नव्हती. मात्र आता पाच दिवसांचा आठवडा करताच दुचाकी व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. हमखास दररोज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कोरोना काळात वाहनांची विक्री होत आहे.कोरोनाचा दुचाकी विक्रेत्यांसाठी असाही सकारात्मक परिणामकोरोना संक्रमण समूहात पसरतो. गर्दी होऊ नये याकरिता शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा बंद केले किंवा त्यांच्यावर निर्बंध आणले. अर्थातच जे चाकरमान जळगाव, रावेर, चाळीसगाव, पाचोरा व अन्य ठिकाणी रेल्वेने, बसने अप-डाऊन करत होते त्यांची मदार आता दुचाकीवर आली किंवा त्यांना स्वत:च्या बचावासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागण ‘खत्रे से खाली नही’ म्हणून फायनान्स, इंस्टॉलमेंट ने का होईना चाकरमाने दुचाकीला खरेदीसाठी पसंती देत आहेत. कोरोना काळाय प्रशासनाने बंद केलेल्या प्रवासी वाहतूक सेवेचा सकारात्मक परिणाम दुचाकी विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे.शंभर ग्राहकातून ८० टक्के ग्राहकांकडून केली जाते खरेदीअनलॉकमध्ये भुसावळ शहरात मंगळवार व शनिवार 'जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात जो व्यवसाय सात दिवसात होत होता, तोच व्यवसाय आता पाच दिवसात होत आहे. शंभरपैकी ८० टक्के ग्राहक हे हमखास दुचाकी खरेदी करतात. त्याचं कारणही तसेच पूर्वी गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह मित्रमंडळी खरेदी करण्यासाठी येत होती व अनेक वेळा फक्त चौकशी करून निघून जायचे. मात्र आता ज्यांना दुचाकीची खरंच गरज आहे अशी मंडळी कुटुंबियांना सोबत न आणता एखाद दोन व्यक्ती येऊन शारीरिक अंतराचे भान ठेवून शहानिशा केल्यानंतर दुचाकी बुक करीत आहेत. पूर्वीच्या मानाने दुचाकी वाहन विक्रीत 'रियल खरीददार' खरेदीसाठी येत आहेत. उगाच कोरोनाची भीती असल्याने चौकशीसाठी कोणीही येत नसल्याचे दुचाकी विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दहावी-बारावीच्या निकालानंतर होते मोठी मागणीयंदा कोरोनामुळे उशिराने निकाल लागत असले तरी निकाल लागल्यानंतर आई-वडील, आप्तेष्ट पुढील शिक्षणासाठी व मुलांचा प्रोत्साहन वाढावे याकरिता हमखास दुचाकी घेऊन देतातच. यामुळेसुद्धा दुचाकी वाहनांची विक्री दहावी बारावीच्या निकालानंतर हमखास वाढते, असा अनुभव आहे.

टॅग्स :MarketबाजारBhusawalभुसावळ