शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अनलॉकमध्ये दुचाकी व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:52 IST

अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देमार्केट रिव्ह्यू रेल्वे, बसेस, कालीपिली, रिक्षा बंदचा परिणामअपडाऊन करणाऱ्यांचा दुचाकीकडे कल

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना लॉकडाऊनमध्ये मंदीच्या सावटाखाली गेलेले आॅटोमोबाईल क्षेत्र विशेषत: दुचाकी व्यवसाय कमालीचा मंदावला होता, मात्र अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला असून, दुचाकी व्यवसायात तेजी आली आहे.सुरुवातीला कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय जवळपास डबघाईला गेले होते. हळूहळू कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर यावे, अर्थचक्र फिरावे याकरिता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. शहरात आठवड्यातून तीन दिवस हे दुचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात दुचाकी विक्री होत नव्हती. मात्र आता पाच दिवसांचा आठवडा करताच दुचाकी व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. हमखास दररोज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कोरोना काळात वाहनांची विक्री होत आहे.कोरोनाचा दुचाकी विक्रेत्यांसाठी असाही सकारात्मक परिणामकोरोना संक्रमण समूहात पसरतो. गर्दी होऊ नये याकरिता शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा बंद केले किंवा त्यांच्यावर निर्बंध आणले. अर्थातच जे चाकरमान जळगाव, रावेर, चाळीसगाव, पाचोरा व अन्य ठिकाणी रेल्वेने, बसने अप-डाऊन करत होते त्यांची मदार आता दुचाकीवर आली किंवा त्यांना स्वत:च्या बचावासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागण ‘खत्रे से खाली नही’ म्हणून फायनान्स, इंस्टॉलमेंट ने का होईना चाकरमाने दुचाकीला खरेदीसाठी पसंती देत आहेत. कोरोना काळाय प्रशासनाने बंद केलेल्या प्रवासी वाहतूक सेवेचा सकारात्मक परिणाम दुचाकी विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे.शंभर ग्राहकातून ८० टक्के ग्राहकांकडून केली जाते खरेदीअनलॉकमध्ये भुसावळ शहरात मंगळवार व शनिवार 'जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात जो व्यवसाय सात दिवसात होत होता, तोच व्यवसाय आता पाच दिवसात होत आहे. शंभरपैकी ८० टक्के ग्राहक हे हमखास दुचाकी खरेदी करतात. त्याचं कारणही तसेच पूर्वी गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह मित्रमंडळी खरेदी करण्यासाठी येत होती व अनेक वेळा फक्त चौकशी करून निघून जायचे. मात्र आता ज्यांना दुचाकीची खरंच गरज आहे अशी मंडळी कुटुंबियांना सोबत न आणता एखाद दोन व्यक्ती येऊन शारीरिक अंतराचे भान ठेवून शहानिशा केल्यानंतर दुचाकी बुक करीत आहेत. पूर्वीच्या मानाने दुचाकी वाहन विक्रीत 'रियल खरीददार' खरेदीसाठी येत आहेत. उगाच कोरोनाची भीती असल्याने चौकशीसाठी कोणीही येत नसल्याचे दुचाकी विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दहावी-बारावीच्या निकालानंतर होते मोठी मागणीयंदा कोरोनामुळे उशिराने निकाल लागत असले तरी निकाल लागल्यानंतर आई-वडील, आप्तेष्ट पुढील शिक्षणासाठी व मुलांचा प्रोत्साहन वाढावे याकरिता हमखास दुचाकी घेऊन देतातच. यामुळेसुद्धा दुचाकी वाहनांची विक्री दहावी बारावीच्या निकालानंतर हमखास वाढते, असा अनुभव आहे.

टॅग्स :MarketबाजारBhusawalभुसावळ