शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भुसावळ येथे साश्रू नयनांनी तिघा बहिणींनी दिला भावाला अग्निडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:28 IST

भुसावळ शहरातील गणेशपुरी जामनेर रोडवरील रहिवाशी पंकज मुरलीधर पाटील यांच्या चितेला त्यांच्या तिन्ही बहिणींनी अग्निडाग दिला. तेव्हा सर्वांना गहिवरून आले होते.

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील गणेशपुरी जामनेर रोडवरील रहिवाशी पंकज मुरलीधर पाटील (४३) यांच्या चितेला त्यांच्या तिन्ही बहिणींनी साश्रू नयनांनी अग्निडाग दिला. तेव्हा सर्वांना गहिवरून आले होते.पंकज पाटील मोटारसायकलचे मेकॅनिकल म्हणून पुणे येथे काम करीत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मॅकेनिकलचे काम अव्याहत सुरू ठेवले. पुणे येथे त्यांचे सर्व व्यवस्थित सुरू असताना तीन दिवसांआधी त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना पुणे येथेच दवाखान्यात भरती केले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना अति दक्षता विभागात दाखल केले. त्यांच्या तिन्ही भगिनी त्यांना भेटण्यासाठी गेल्या. तेव्हा पंकज यांनी भुसावळ येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शनिवारी भुसावळ येथे घेऊन आल्यावर घरी त्यांचे निधन झाले.पंकज यांना मुलगा नसल्याने त्यांना अग्निडाग देणार कोण हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी समाजातील पारंपरिक प्रथेला फाटा देत तिन्ही बहिणींनी पुढे येत अग्निडाग द्यायचे ठरवले. घरातील सर्व नातेवाईकांनी होकार देताच भुसावळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, दोन मुली दीपिका व खुशबू असा परिवार आहे.अंत्यसंस्कारावेळी कांचन सुहास इंगळे (ठाणे), रंजना धनराज चौधरी (मनमाड) व अरुणा नीरज जावळे (बडोदा) या तिन्ही बहिणींनी दाखवलेले आपले आद्य कर्तव्य पाहून उपस्थितांना गहिवरून आले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ