शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छतेचा संदेश घेऊन भुसावळचा कय्युम काश्मीर ते कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:54 IST

प्रति दिवसाला ६०० किलोमीटर अंतर करणार पार

भुसावळ : येथील ३२ वर्षीय कय्युम खान हा राष्ट्रीय एकात्मता तसेच स्वच्छतेचा संदेश यासाठी भुसावळ येथून काश्मीर ते कन्याकुमारी सफरसाठी दुचाकीद्वारा भारतभ्रमण करणार आहे. तो ७ रोजी भुसावळ येथून निघेल.४८ मोटारसायकल रायडर्स काश्मीर ते कन्याकुमारी या तब्बल आठ हजार कि.मी. अंतराची रायडींग १६ दिवसात पूर्ण करण्यासाठी लेह येथून १६ सप्टेंबरला सफरीला सुरूवात करणार आहेत व २२ सप्टेंबरला कन्याकुमारी येथे पोहचणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. यात मेकॅनिकचा काम करणारा भुसावळचा कय्युम खान (३२) याचा समावेश आहे.हा युवक भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून ७ सप्टेंबरला सुरुवात करून १३ रोजी लेह येथे मोहीमेसाठी पोहोचणार आहे. तसेच कन्याकुमारी येथूनदेखील मोटारसायकलने भुसावळला पोहोचणार आहे. या मोहिमेतून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, दिल्ली, आसाम या राज्यातील एकूण ४८ मोटारसायकल चालक स्वच्छता एकात्मता व शांती असे छापील संदेश देत जनजागृती करणार आहे.या मोहिमेबद्दल माहिती देतांना कय्युम खान याने सांगितले की, ७ सप्टेंबरला भुसावळहुन मी गांधी पुतळा येथून सुरुवात करणार असून जळगावहून प्रवीण पाटील, हिमांशू शिरसाळे व हर्षल तावडे साथीला असतील. मालेगाव, सटाणा, कळवणमार्गे सापुतारा येथे गुजरात रायडर्स मॅनिया संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिल्यावर बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, लुधियाना,जम्मू, सोनमार्ग, कारगिलमार्गे लेहला पोहोचणार आहे. सापुतारा येथे मुंबईचे एक रायडर आम्हाला सोबतीला जुडतील. कारगिल स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर लेहला जाणार आहेत. कन्याकुमारीहुन मी एकटाच मोटरसायकलवर भुसावळला बंगलोर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद मार्गे परतणार आहे. संपूर्ण प्रवासात रस्ते सुरक्षा, शांती व एकात्मता स्वच्छता हाच संदेश देणार आहे. आजपर्यंत देशात एवढ्या मोठ्या संख्येने मोटरसायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले नाही म्हणून लिम्का बुक आॅफ इंडिया व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड याची नोंद करणार आहे.वयाच्या पाचव्या वर्षापासून सायकलिंगचा छंद होता वडील निजाम खान हे स्वत: सायकल रेसर असल्याने त्यांनी पाठबळ दिले आहे, असे कय्युमने सांगितले.या भ्रमणासाठी तो प्रती दिवसाला ६०० कि.मी.अंतर पार करणार आहे. दरम्यान कयूम याने २०१७ वर्षात ही नदी स्वच्छ रहावी तसेच नदी वाचवा या संदेशासाठी १५ हजार कि.मी.चा मार्गक्रमण ४२ दिवसात पुर्ण केला होता. यात कोटेश्वर नारायण सरोवर, लेह लदाख, अरुणाचल प्रदेश तेजू, कन्याकुमारी येथे तो नदी वाचवण्याचा व स्वच्छ राहावी यासाठी दुचाकी द्वारे भ्रमण करून संदेश दिला होता. हे प्रेरणा कमला त्याचे गुरू रायडर अफजलखान यांच्याकडून मिळाली आहे.