शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 22:30 IST

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिले न.पा.ला आदेशआ.सावकारे व पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नाला यश‘लोकमत’ने वारंवार केला पाठपुरावा

भुसावळ : शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे. मुख्य रस्त्यांसह सर्वच रस्ते अक्षरश उदध््वस्त झाले आहेत. माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगराध्यक्ष रस्ते बनवण्यात अपयशी ठरले आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यातच यासंदर्भात आवाज उचलला आहे, तर आमदार संजय सावकारे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्त्यांच्या कामासंदर्भात विचारणा केली आहे. महिनाभरात रस्ते पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी नूतन मुख्याधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे महिनाभरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.आमदार सावकारे यांनी शहरातील रस्त्यांसंदर्भात जिल्हाधिकारी राऊत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र देऊन नगरपालिकेत निधी शिल्लक असतानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सावकारे व जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा केली. मुख्याधिकारी चिद्रवार यांना एका महिन्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.२५ रोजी पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी भुसावळातील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती मागवली होती. त्यानुसार २९ रोजी पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाºयांना निधी असूनही खड्डे का बुजवले जात नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर माजी मंत्री खडसे व आमदार सावकारे यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली.पालकमंत्री पाटील यांचे पत्र आले आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून एका महिन्यात पूर्ण शहर ‘खड्डे मुक्त’ करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ