शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंदचा दालमिल चालकांना भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:17 IST

बाहेरील जिल्ह्यातून आणावा लागतोय कच्चा माल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे धान्यासह कडधान्याचीही आवक बंद असल्याने त्याचा फटका दालमिलला बसू लागला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह विदर्भातून कच्चा माल आणण्याची वेळ दालमिल चालकांवर आली आहे. विशेष म्हणजे हरभºयाच्या आयातीवर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली असल्याने त्याचा अधिक तुटवडा जाणवत असल्याचे दालमिल चालकांनी सांगितले.परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्याने ती जो पर्यंत बांधून दिली जात नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने घेतला. त्यामुळे १७ जूनपासून बाजार समितीमध्ये व्यापाºयांचा बंद सुरू आहे़माल उपलब्ध होईनागेल्या ११ दिवसांपासून बंद सुरूच असल्याने येथे माल खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम दालमिलवर होऊ लागला आहे. जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशात आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता बाजार समितीमधील बंदमुळे स्थानिक पातळीवर माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.बाहेरील बाजार समितीमधून मालाची खरेदीजळगावात माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दालमिल चालकांना अकोला, अमरावती, खामगाव येथे धाव घेऊन तेथून कच्चा माल आणावा लागत आहे. यात प्रवास खर्च वाढल्याने दालमिल चालकांना भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.उत्पादनावर परिणाम नाहीकच्चा माल उपलब्ध होत नसला तरी उत्पादन थांबलेले नाही. मात्र इतर शहरांमधून कच्चामाल आणावा लागत असल्याने खर्च वाढला असला तरी मागणी नसल्याने डाळींचे भाव वाढविता येत नसल्याचेचित्रआहे.त्यामुळे हा भूर्दंड दालमिल चालकांनाच सहन करावा लागत आहे.दालमिलचा मोठा आधारजळगावातील उद्योगांची स्थिती बिकट असताना दालमिल कसेबसे सावरून उद्योग वाढीला हातभार लावत आहे. त्यात अशा प्रकारच्या बंदमुळे उद्योगांवर परिणाम होत असेल तर ते उद्योगांसाठी मारक असल्याने बंदसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांनी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दालमिल चालकांचे म्हणणे आहे.बाजार समितीमधील व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदमुळे स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह अकोला, खामगाव, अमरावती येथून कच्चा माल आणावा लागत आहे. त्या मुळे कच्च्या मालासाठी खर्च वाढलेला आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव