शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:31 IST

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर ...

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर संत एकनाथ महाराजांनी आचारसंहिता सांगितली आहे.भाव धरोनिय वाची ज्ञानेश्वरी ।कृपा करी हरी तयावरी ।। जर मनात भाव नसेल तर ज्ञानेश्वरी वाचू नये असे संत एकनाथ महाराजांना म्हणावयाचे आहे. मनात भाव असल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा प्रभाव कसा जाणवेल? हरी कृपा कशी करेल? मनात भाव धरूनच ज्ञानेश्वरी वाचावी, मगच हरी त्या वाचणाऱ्यावर कृपा करेल. ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द म्हणजे अमृताचे थेंब आहेत. या शब्दात सागराएवढा अर्थ भरला आहे. संत जनाबार्इंनी तर स्पष्ट शब्दात सांगितले आहे.वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी। ज्ञान होय अज्ञानासी, ऐंसा वर या टिकेशी ।।जर वाचायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यांनी पंढरी पहा. अज्ञानी माणसाला देखील ज्ञान प्राप्त होतं, जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर, कारण या ग्रंथाला असा वर आहे. परंतु सामान्य माणसांना हे पटणं अवघड जातं, कारण अशा प्रकारच्या ग्रंथसंपदा वाचता-वाचता संशय येतो आणि हा संशय श्रद्धेचा नाश करतो. त्यासाठी संत एकनाथ महाराजांनी सांगितले आहे.एका जनार्दनी संशय सोडोनि । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ।।श्रीकृष्णानीदेखील गीतेच्या चौथ्या अध्यायात संशयाबाबत सविस्तर वर्णन केले आहे आणि माऊलींनी तर अगदी सर्वांना समजेल असे दृष्टांतासकट यावर भाष्य केले आहे.मनुष्य संशयात पडला की, नि:संशय नाश पावतो व तो ऐहिक सुखाना मुकतो. एकदा माणसाला संशयाने ग्रासले की, त्याला खरे-खोटे, चांगले-वाईट काहीच समजत नाही.ज्याप्रमाणे जन्मांध पुरुष रात्र व दिवस ओळखत नाही. त्याप्रमाणे संशयात पडलेल्या मनुष्याच्या बुद्धीला दुसºयाचे सांगणे मुळीच पटत नाही. विज्ञानाने देखील आता मान्य केले आहे की, संशय हा एक आजारच आहे. आणि हा आजार फार मोठा भयानक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,म्हणूनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशांची वागुर । प्राणियांसी ।।संशायाहून दुसरे अत्यंत घोर पातक नाही. संशय हे प्राण्याच्या सर्वनाश करणारे जाळे आहे.भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना म्हणून, तू या संशयाचा त्याग कर. प्रथम संशयाला जिंक. हा संशय जेथे यथार्य ज्ञान नाही, तेथेच असतो. संशय श्रद्धाच बसू देत नाही. हा संशय वाढला की, तो बुद्धीलाही भ्रष्ट करतो.ज्ञानोबांच्या या विवेचनावरून संशय किती भयानक असतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. संसारात असो, परमार्थात असो, आणि कोठेही असो याचा त्याग करणे गरजेचे आहे. नाहीतर हा संशय बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही.सर्व शास्त्रात सांगितले आहे की, संशय नसावा तर चौकशी असावी. ज्याच्या मनात संशयाने प्रवेश केला त्याला काही बरे वाटत नाही आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे संशयासारखे मोठे पातक नाही; म्हणूनच संशयाचा त्याग करण्यासाठी भगवंताची कृपाच लागते.- डॉ.कैलास पाटील, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव