जळगाव - यावल तालुक्यातील न्हावी या गावाचे नाव काढताच सर्वांना आठवण होते ती, राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री जे़टी़दादा महाजन यांची़ गावाने गाडगेबाबा स्वच्छता अभियानात तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार मिळविला आहे़ गेल्या वर्षभरात गाव आणि परिसरात अकराशे वृक्षांची लागवड करून झाडे जगविली आहेत़ तसेच गावात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे़ स्वच्छता आणि शिक्षण हे गावाचे वैशिष्ट्य आहे़ ग्रामपंचायतीमार्फत अनेक दाखले आॅनलाईन दिले जात आहे़
न्हावीच्या भारती नितीन चौधरी यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:16 IST