शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 22:28 IST

‘महाविकास’ आघाडी ‘महाभकास’ झाल्याची टीका

जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका सुरु असल्याचे ते म्हणाले.जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी जावळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते. या प्रसंगी जावळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करीत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.सातबारा अद्यापही कोरा नाहीभाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप हरिभाऊ जावळे यांनी केला.ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे जावळे म्हणाले. सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकºयांची सरसकट फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.चांगली कामे थांबविण्याचा धडाकाभाजप सरकारने विविध कामांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सुरू झालेली चांगली कामेही थांबविण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पावसाळ््यात दमदार पाऊस झाला व शेततळ््यांचीे कामे चांगलीे झाल्याने रब्बी हंगाम चांगला आला. हरभरा चांगला आला असला तरी खरेदी केंद्र नाही, तूर खरेदीही केवळ साडे तीन क्विंटलपर्यंत केली जात आहे.राष्ट्र हिताला बाधासीएए वरून तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू असून याद्वारे राष्ट्र हिताला बाधा पोहचविण्याचे कामदेखील राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जावळे यांनी केला.महिला अत्याचारात वाढराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाटच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून पोलिसांचा धाक संपल्याची टीका जावळे यांनी केली. तीन पक्ष मिळून स्थापन झालेले हे सरकार म्हणजे ‘तिºह्या’ रंगाचे सरकार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव