शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जीवनावर भागवत महापुराणचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:42 IST

‘सिद्धांत व दृष्टांत’ या न्यायानुसार मानवाची जीवनगंगा वाहात असते. लहानपणापासूनच ‘सत्य वद’ हा धर्मशास्त्राचा सिद्धांत समजावून घेताना लाकुडतोड्याचा दृष्टांत पिढ्या न पिढ्या संक्रमीत झालेला हिंदू संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतो. असेच अनेक धर्ममूल्य नीतीमूल्ये मानवाला समजावून सांगणारा व पुराणांमध्ये ‘मुकुट मणी’ ठरलेला व श्रीमद् ही उच्च कोटीची पदवी प्राप्त केलेला ग्रंथ ...

‘सिद्धांत व दृष्टांत’ या न्यायानुसार मानवाची जीवनगंगा वाहात असते. लहानपणापासूनच ‘सत्य वद’ हा धर्मशास्त्राचा सिद्धांत समजावून घेताना लाकुडतोड्याचा दृष्टांत पिढ्या न पिढ्या संक्रमीत झालेला हिंदू संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतो. असेच अनेक धर्ममूल्य नीतीमूल्ये मानवाला समजावून सांगणारा व पुराणांमध्ये ‘मुकुट मणी’ ठरलेला व श्रीमद् ही उच्च कोटीची पदवी प्राप्त केलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत महापुराण होय.भागवत महापुराण हे संस्कृत साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. पुराण वाङमयात लोकप्रियतेच्या दृष्टीने ते अद्वितीय आहे. गीतेनंतर एवढा सर्वमान्य ग्रंथ संस्कृत भाषेत झाला नाही. गेली कित्येक शतके भारतीय जीवनावर या पुराणाचा विलक्षण प्रभाव आहे. या ग्रंथात काव्य आहे. विविध कथा आहेत. आणि तत्त्वज्ञान सुद्धा आहे. बालकृष्णाच्या बाललिला आणि प्रौढ कृष्णाच्या पराक्रम कथा यात आहेत. योगेश्वर कृष्णाने उद्धवाला केलेला तत्त्वोपदेशही आहे. त्यात भक्तीची कर्म व ज्ञान यांच्याशी उत्तम सांगड घातलेली आहे. त्यात कर्माला हीन न मानता नरदेह हा भगवंताची सर्वोत्तम देणगी आहे. हे यात प्रतिपादन केलेले आहे. सध्याच्या काळात हा सिद्धांत प्रत्येक भारतीयाने आचरणात आणला तर आत्महत्येचा प्रश्नच उद्भवणार नाही! नाही का?हा ग्रंथ फार मोलाचा आहे. पूर्वीच्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या भक्तीपेक्षा नव्या प्रकारची भक्ती भागवत महापुराणात आली आहे. काही विचार न करता या ग्रंथात काहीही लिखाण केलेले आढळून येत नाही. उलट काही विचार तर अध्यात्म आणि भक्ती यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च आहेत. भागवतातील अशा विचारांचा अभ्यास केला की वाटते जिवंत धार्मिक अनुभवांचा तो आविष्कार आहे.-दादा महाराज जोशी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव