शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कीटकनाशकांचा वापर करावा जपून

By ram.jadhav | Updated: October 23, 2017 23:53 IST

शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़

ठळक मुद्देयोग्य प्रमाण गरजेचेएकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर वाढावाशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची

आॅनलाईन लोकमत, दि़ २४ - बी.डी.जडेजळगाव : भारतात सर्वाधिक रासायनिक कीड व कीटकनाशके वापरण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहे़ दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या रासायनिक औषधांचा कीड नियंत्रणासाठी वापर करीत आहेत़ औषधांचा हा वाढता वापर शेतकºयांसाठी तत्काळ घातक तर ठरतच आहे़, शिवाय नैसर्गिक चक्रालाही यामुळे बाधा निर्माण होत आहे़ तसेच रसायनांच्या अतिवापरामुळे भाजीपाला व इतरही सर्व पिकांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन बहुतेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे़ आजच्या घडीला शेतकºयांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज आहे़ विशेष करून द्राक्ष, डाळिंब, कपाशी व भाजीपाल्याची सर्व पिके यांच्यासंबंधी शेतकºयांनी खास काळजी घेण्याची गरज आहे़ शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़औषधांचा प्रकाऱ़़आॅर्गनो क्लोराईड, आॅर्गनो फॉस्फरस, पायरेथ्रॉईड, नेकेटोनॉईड, कारबॅमाईट्स तसेच स्पर्शजन्य व आंतरप्रवाही या प्रकारातील औषधांची निवड कीटकांच्या प्रकारानुसार करावी़ कोणतेही औषध वापरताना ते प्रमाणापेक्षा वापरू नये, आवश्यक असल्यास त्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधांचा योग्य वापर केला जावा़ शासनाकडून औषध विक्रेत्यांना व शेतकºयांनाही वेळोवेळी नियमितपणे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे़जैविक पद्धतींचा वापर जास्त करावा़़़एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतकºयांनी वापर करावा़ तसेच जैविक पद्धतीने कीटक नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर करावा, निंबांळी अर्क, तंबाकू अर्क, गोमूत्र, कामगंध सापळे, पिवळे चिकट पुठ्ठे, सापळा पिके, प्रकाश सापळा इत्यादी पद्धतींचा वापर करावा़ तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसताच शेतकºयांना याबाबत जागृत करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे़ तसेच फवारणी करताना शेतकºयांनी भरउन्हात फवारणी करणे टाळावे, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला पूर्णपणे झाकून, हातमोजे, चष्मा किंवा हेल्मेट (सेफ्टी किट) इत्यादी साहित्याचा वापर अवश्य करावा़ शक्यतो संपूर्ण अंग झाकूनच कोणत्याही औषधांची फवारणी करावी़ फवारणीनंतर साबणाने स्वच्छ अंघोळ करणे गरजेचे आहे़घ्यावयाची काळजी़़एकच पीक पद्धती टाळावी, म्हणजेच पिकांची फेरपालट करणे, कीटकांचे जीवन चक्र तोडावे, लागवडीच्या वेळेत बदल करणे, खूप उशिरा लागवड करणे टाळावे, भौतिक, जैविक, यांत्रिक आणि रासायनिक अशा सर्व प्रकारच्या पद्धतींचा आलटून-पालटून वापर करावा़ तसेच स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो़ किडींच्या व कीटकांच्या प्रकारानुसार, योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करावा़ जसे, कीटकांच्या तोडांचा आकार, त्यांचा चावण्याचा प्रकार, रसशोषण करण्याची पद्धत, टोचण्याची पद्धत आदींचे बारकाईने निरीक्षण करून व किडींचा प्रकार ओळखूनच औषधांची निवड करावी़ जास्त औषधे एकत्र करू नयेत़़शेतकºयांनी किडींची ओळख पटल्यावर योग्य ते एकच औषधे वापरावे़ दोनपेक्षा जास्त कीटकनाशके एकत्र करून वापरू नयेत़ तसेच वेगवेगळ्या प्रकारातीलही अनेक औषधे एकाच वेळी एकत्र करून फवारणी करू नये़ एका वेळी एकच कीडनाशक व बुरशीनाशक वापरावे़औषधांवरील या चिन्हांचे निरीक्षण करून विषारी औषधांची तीव्रता तपासता येते़ गरजेनुसार यातील औषधांचा वापर करावा़