शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा ...

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा महिन्याभराचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग-धंदे बंद राहणार आहेत. त्यामुळे आमचे कामही बंद राहणार आहे. तसेच काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं. त्यामुळे आम्ही जळगावहून आमच्या गोरखपूर या गावी जात असल्याची माहिती या परप्रांतीय बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, दररोज हजारो रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून येत आहेत. तर राज्यभरात हीच परिस्थिती असल्याने चार दिवसांपासून राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या उद्योग-व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. अखेर परप्रांतीय बांधवांनी शहरातील बाजारपेठा बंद असल्याने गावी जाण्याला पसंती दिली असून, जळगावात विविध ठिकाणी काम करणारे परप्रांतीय मजूर रेल्वेने गावाकडे परतताना दिसून येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या परप्रांतीय बांधवांना गावी जाण्यासाठी भुसावळ येथून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

परप्रांतीय बांधवांच्या प्रतिक्रिया

जळगावात एका हॉटेलवर मी कामाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद राहणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राहण्यापेक्षा कुटुंबासह गोरखपूरला घरी जात आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर पुन्हा येणार आहे.

- दीपक कश्यप.

एका बांधकामाच्या ठिकाणी मी कामाला आहे. काम सुरू असले तरी कोरोनामुळे जळगावात राहणे भीतीचे वाटत आहे. त्यामुळे गावाला जात आहे. गावाला शेती असून, गावात एखादा लहान व्यवसाय करेन. कोरोना संपल्यानंतर पुन्हा जळगावला येण्याचा विचार करेन.

- दिनू साहेब

पाळधीला एका रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मी कामाला होतो. सध्या कोरोनामुळे काम बंद आहे. जळगावात राहून दुसरे काम काय शोधणार? त्यामुळे सध्या गावाला जात आहे. गावाला शेती नाही. मात्र, काहीतरी छोटे-मोठे काम शोधेन.

- आशिष यादव,

इन्फो :

बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल मार्गांवर मोठी गर्दी

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने जळगाव शहर व परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे परतत आहेत. यात बिहार राज्यातील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- तसेच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, मेरठ, लखनऊ व गाझियाबाद या ठिकाणी जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांची स्टेशनवर मोठी गर्दी आहे. शहर व परिसरात आपल्या कुटुंबासह राहणारे नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परतत आहेत. यात जळगावहून गाड्यांची संख्या कमी असल्याने या प्रवाशांना भुसावळ येथून गाड्या पकडाव्या लागत आहेत.

- परप्रांतीय बांधवांना घेऊन जाणाऱ्या या गाड्या मुंबई येथूनच प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल होऊन येत आहेत. परिणामी, जळगाव व भुसावळ येथून चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळेना झाले आहे. तिकीट आरक्षण करूनही या प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असून, गर्दीमुळे रेल्वे डब्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडत आहे.