शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा ...

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा महिन्याभराचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग-धंदे बंद राहणार आहेत. त्यामुळे आमचे कामही बंद राहणार आहे. तसेच काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं. त्यामुळे आम्ही जळगावहून आमच्या गोरखपूर या गावी जात असल्याची माहिती या परप्रांतीय बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, दररोज हजारो रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून येत आहेत. तर राज्यभरात हीच परिस्थिती असल्याने चार दिवसांपासून राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या उद्योग-व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. अखेर परप्रांतीय बांधवांनी शहरातील बाजारपेठा बंद असल्याने गावी जाण्याला पसंती दिली असून, जळगावात विविध ठिकाणी काम करणारे परप्रांतीय मजूर रेल्वेने गावाकडे परतताना दिसून येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या परप्रांतीय बांधवांना गावी जाण्यासाठी भुसावळ येथून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

परप्रांतीय बांधवांच्या प्रतिक्रिया

जळगावात एका हॉटेलवर मी कामाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद राहणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राहण्यापेक्षा कुटुंबासह गोरखपूरला घरी जात आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर पुन्हा येणार आहे.

- दीपक कश्यप.

एका बांधकामाच्या ठिकाणी मी कामाला आहे. काम सुरू असले तरी कोरोनामुळे जळगावात राहणे भीतीचे वाटत आहे. त्यामुळे गावाला जात आहे. गावाला शेती असून, गावात एखादा लहान व्यवसाय करेन. कोरोना संपल्यानंतर पुन्हा जळगावला येण्याचा विचार करेन.

- दिनू साहेब

पाळधीला एका रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मी कामाला होतो. सध्या कोरोनामुळे काम बंद आहे. जळगावात राहून दुसरे काम काय शोधणार? त्यामुळे सध्या गावाला जात आहे. गावाला शेती नाही. मात्र, काहीतरी छोटे-मोठे काम शोधेन.

- आशिष यादव,

इन्फो :

बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल मार्गांवर मोठी गर्दी

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने जळगाव शहर व परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे परतत आहेत. यात बिहार राज्यातील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- तसेच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, मेरठ, लखनऊ व गाझियाबाद या ठिकाणी जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांची स्टेशनवर मोठी गर्दी आहे. शहर व परिसरात आपल्या कुटुंबासह राहणारे नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परतत आहेत. यात जळगावहून गाड्यांची संख्या कमी असल्याने या प्रवाशांना भुसावळ येथून गाड्या पकडाव्या लागत आहेत.

- परप्रांतीय बांधवांना घेऊन जाणाऱ्या या गाड्या मुंबई येथूनच प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल होऊन येत आहेत. परिणामी, जळगाव व भुसावळ येथून चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळेना झाले आहे. तिकीट आरक्षण करूनही या प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असून, गर्दीमुळे रेल्वे डब्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडत आहे.