शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे हाच सर्वोत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत ...

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत वेळीच तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या व त्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन व इतर औषधी यांची उपलब्धता यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती देत कोरोना नियंत्रणासाठी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले.

१५ हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार शक्य

कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज ११ हजार सक्रिय रुग्ण असून त्यादृष्टीने बेड, ऑक्सिजन व औषधी याविषयी नियोजन केले जात आहे. यामध्ये बेडचा प्रश्न मार्गी लागला असून एकाच वेळी १५ हजार रुग्ण उपचार घेऊ शकतात, एवढी क्षमता झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यात ऑक्सिजन बेडचीदेखील अडचण नाही, मात्र कधी-कधी व्हेंटिलेटरचा प्रश्न उपस्थित होतो. त्यावरही बेड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बेड उपलब्ध झाले असले तरी ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असल्याने त्याची बचत करणे महत्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादनच कमी झाल्याने त्याचा पुरवठा कमी असल्याने त्याविषयीदेखील रुग्णालयांना सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढत्या रुग्ण संख्येने मनुष्यबळाचाही प्रश्न

कोरोनाचे रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास ऑक्सिजन, रेमडेसिविरसह मनुष्यबळाचीही कमतरता भासू शकते, अशी शक्यता वर्तवित पुढील धोके टाळण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिबंधात्मक उपाय हाच उपचार

गेल्या वर्षापेक्षा आता कोरोनाचा संसर्ग गंभीर असून यामध्ये तरुणांनाही त्याची लागण होत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळले पाहिजे तसेच थोडेही लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. अनेक ठिकाणी टायफाईडचा आजार म्हणून उपचार करून घेतले जात आहे. मात्र तसे न करता वेळीच तपासणी करावी आणि पुढील ऑक्सिजन व इतर औषधोपचारासाठी होणारी धावपळ तसेच गंभीर होण्याची स्थिती टाळता येऊ शकते, असे जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी देखील माहिती देत ४५ वर्षाच्या पुढील सर्वांनी लसीकरण करून घेत धोका टाळावा असे आवाहन केले. लसींच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लसीकरण केले जाणार असून असल्याचे त्यांनी सांगितले.