शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून पांडव व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

वार्तापत्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये ...

वार्तापत्र

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये आता दोन्ही गट एकमेकांना कौरव-पांडवांची उपमा देत आहेत. बंडखोर नगरसेवक शहराच्या विकासासाठी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगत आहेत. तर भाजपकडून या नगरसेवकांवर केवळ स्वत:चा विकास करण्यासाठी पक्षाविरोधात गेल्याचा आरोप केला जात आहेत. बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये अन्याय झाल्याने पक्षांतर करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे सांगत, भाजपच्या विद्यमान नेत्यांनी कौरवांप्रमाणे आमच्यावर अन्याय केल्याचा आरोपही बंडखोरांनी केला आहे. आता जळगाव महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर दोन्ही गट एकमेकांसमोर आले असले तरी या लढाईत पराभव हा जळगाव शहरातील नागरिकांचाच होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण,हे नगरसेवक मग बंडखोर असोत वा सेना-भाजपचे असो, कधीही शहराच्या विकासासाठी एकमेकांशी भांडलेले दिसून येत नाहीत. ज्या पांडवांची उपमा घेण्यासाठी बंडखोर व भाजपचे नगरसेवक पुढे येत आहेत. त्या पांडवांनी मरुस्थल असलेल्या खांडवप्रस्थला आधी इंद्रप्रस्थ करून दाखविले होते. मगच त्यांनी कौरवांना रणांगणात आव्हान दिले होते. मात्र, जळगाव शहरात वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. जळगाव शहर जे कधी इंद्रप्रस्थ होते ते आज खांडवप्रस्थ होण्याच्या मार्गावर असताना याठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र स्वत:चीच थोरवी गाण्यात मश्गुल आहेत. जळगावकरांना सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, धूळ, चिखलाच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत असे असताना पांडव कोण आणि कौरव कोण ? यामध्ये शहराचे लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. अडीच वर्षात भाजपला शहराच्या विकासासाठी बोंब पाडता आली नाही, आणि बंडखोर देखील त्या सत्तेत सहभागी होते. त्यामुळे त्यावेळेसही बंडखोरांनाही आवाज उठविता आला नाही. आवाज उठविला तो केवळ ठेक्यांसाठी. त्यामुळे शहरातील कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधींना पांडव होण्याचा हक्कच नाही. मात्र, येणाऱ्या काळात जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून दाखवतील त्यांनाच जनताही आपल्या मनात पांडवांचा दर्जा देईल. मात्र, शहराचे खांडवप्रस्थ राहिल्यास, मनपाच्या कुरुक्षेत्रावर बंडखोर, भाजप व सेनेच्या नगरसेवकांना नागरिकांशीच दोन हात करण्याची वेळ येईल.