शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून पांडव व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

वार्तापत्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये ...

वार्तापत्र

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून फुटून गेलेले नगरसेवक व भाजपमध्ये थांबलेल्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपामध्ये आता दोन्ही गट एकमेकांना कौरव-पांडवांची उपमा देत आहेत. बंडखोर नगरसेवक शहराच्या विकासासाठी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगत आहेत. तर भाजपकडून या नगरसेवकांवर केवळ स्वत:चा विकास करण्यासाठी पक्षाविरोधात गेल्याचा आरोप केला जात आहेत. बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये अन्याय झाल्याने पक्षांतर करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे सांगत, भाजपच्या विद्यमान नेत्यांनी कौरवांप्रमाणे आमच्यावर अन्याय केल्याचा आरोपही बंडखोरांनी केला आहे. आता जळगाव महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर दोन्ही गट एकमेकांसमोर आले असले तरी या लढाईत पराभव हा जळगाव शहरातील नागरिकांचाच होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण,हे नगरसेवक मग बंडखोर असोत वा सेना-भाजपचे असो, कधीही शहराच्या विकासासाठी एकमेकांशी भांडलेले दिसून येत नाहीत. ज्या पांडवांची उपमा घेण्यासाठी बंडखोर व भाजपचे नगरसेवक पुढे येत आहेत. त्या पांडवांनी मरुस्थल असलेल्या खांडवप्रस्थला आधी इंद्रप्रस्थ करून दाखविले होते. मगच त्यांनी कौरवांना रणांगणात आव्हान दिले होते. मात्र, जळगाव शहरात वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. जळगाव शहर जे कधी इंद्रप्रस्थ होते ते आज खांडवप्रस्थ होण्याच्या मार्गावर असताना याठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र स्वत:चीच थोरवी गाण्यात मश्गुल आहेत. जळगावकरांना सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, धूळ, चिखलाच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत असे असताना पांडव कोण आणि कौरव कोण ? यामध्ये शहराचे लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. अडीच वर्षात भाजपला शहराच्या विकासासाठी बोंब पाडता आली नाही, आणि बंडखोर देखील त्या सत्तेत सहभागी होते. त्यामुळे त्यावेळेसही बंडखोरांनाही आवाज उठविता आला नाही. आवाज उठविला तो केवळ ठेक्यांसाठी. त्यामुळे शहरातील कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधींना पांडव होण्याचा हक्कच नाही. मात्र, येणाऱ्या काळात जळगावरुपी हस्तीनापूरचा विकास करून दाखवतील त्यांनाच जनताही आपल्या मनात पांडवांचा दर्जा देईल. मात्र, शहराचे खांडवप्रस्थ राहिल्यास, मनपाच्या कुरुक्षेत्रावर बंडखोर, भाजप व सेनेच्या नगरसेवकांना नागरिकांशीच दोन हात करण्याची वेळ येईल.