शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तरुणांनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक नागरिक व्हा : डॉ.अशोक जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:15 IST

तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठया संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी यांनी केले.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ वा पदवीप्रदान समारंभगुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदकेपदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि .२७ : तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठया संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी यांनी केले.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार, २७ रोजी पार पडला. यावेळी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना डॉ.अशोक जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते.डॉ.जोशी यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, जगात गरीबी कमी होत आहे, माणसाचे आयुर्मान वाढले आहे, जीडीपी वाढला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. वीज सर्वत्र उपलब्ध होत आहे. सौरऊर्जेची किंमत कमी होत आहे. शेतीतील तंत्रज्ञान वाढले आहे. हे सगळे बदल केवळ तंत्रज्ञानामुळेच होत असून पुढील दहा वर्षात आपला मोबाईल दहा लाख पटीने शक्तीमान होईल. चालकाविना गाडी चालेले. गतीमान संगणक येत आहेत. रोबोटने माणसाची जागा घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या या घोंघावणाज्या वादळात रोजगाराची खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणूकीने सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणूकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव शरद जोशी होते. दीक्षांत मिरवणूकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते.यावेळी गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले. या पदवीप्रदान समारंभात ३५ हजार १६४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २२२ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव