शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘बीन फेरे हम तेरे’ चे रुपांतर झाले ‘हे बंध रेशमाचे’मध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:45 IST

गुजराथमधील दमण येथे कंपनीत काम करीत असताना परमेश्वर नामक तरुणाचे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिच्याशी संसार करीत असतांना दोन अपत्य झाले. तथापि मुलाचे जावळं काढण्यासाठी विधीवत विवाह झालेला पाहिजे या रुढीप्रमाणे या दाम्पत्याचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे १४ मार्च रोजी विधीवत विवाह लावण्यात आला.

ठळक मुद्देआधी अपत्य आणि नंतर झाला विवाहमंगरूळ येथील तरुणाने घेतले आदिवासी मुलीशी सात फेरेपुत्राच्या पाठीशी पिता खंबीरपणे राहिला उभा

लोकमत आॅनलाईनअमळनेर, दि.१५ : मानवी जीवनात तारुण्यात आधी विवाह त्यानंतर मुलेबाळे असा सांसरिक जीवनाचा नियम आहे. मात्र प्रेमसंबंध जुळलेल्या परमेश्वराने ‘रसीला’शी संसार करून मुले जन्माला घातली आणि मग रितसर १४ मार्च रोजी विधीवत विवाह केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. परमेश्वराच्या या विवाहात समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याच्या पित्याने खंबीरपणे पाठीमागे उभे राहून साथ दिली.अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील परमेश्वर बापू पाटील हा २००२ मध्ये नववीत असताना शाळा सोडली आणि बकऱ्या चारु लागला . मात्र मिळणाºया मोबदल्यात पोट भरणे अवघड झाले म्हणून मंगरूळ सोडले आणि गुजरातमधील दमण गाठले. तेथे फायबर पेस्टल कंपनीत कामगार म्हणून काम करू लागला. त्याच ठिकाणी गुजराथी आदिवासी तरुणी ‘रसीला’ ही देखील कामाला येऊ लागली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांवर जीव जडला. तोपर्यंत परमेश्वर तेथील लहान मोठ्या कामाचे कंत्राट घेऊ लागला. एक दिवस दोघांनी आयुष्यभर साथ राहण्याचा निर्णय घेतला आणि एका लहानशा मंदिरात जाऊन पाषाणातील देवाच्या साक्षीने परमेश्वराने रसीलाच्या गळ्यात हार टाकून तिला आपली अर्धांगिनी मानले.दोघांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या प्रेमाचे ‘प्रतीक’ जन्माला आले. पुन्हा दोन वर्षांनी दोघांचे प्रेम ‘उज्वल’ करणारी कन्या जन्माला आली. त्यादरम्यान परमेश्वर याच्या भावाचा मृत्यू झाला. त्याने गुजरात सोडले. त्याचा मुलगा प्रतीक ५ वर्षाचा तर उज्वला ३ वर्षांची झाली. त्या दरम्यान परमेश्वराने बोईसर गाठले. जुन्या व्यवस्थापकाच्या मदतीने कॅम्लिन कंपनीत रेयॉन खडूंना रॅपर लावण्याचे कंत्राट मिळवले आणि जीवनाची घडी व्यवस्थित बसवली. इकडे मंगरूळ ग्रामीण भाग असल्याने मराठा समाजाच्या मुलाने आदिवासी मुलगी केली म्हणून समाज नाक- तोंड मोडू लागला होता. मात्र परमेश्वराचे वडील बापू पाटील हे साधे भोळे शेतकरी, परिस्थितीने गरीब माणूस. पण विचारांनी व मनाने खूप मोठा माणूस. त्यांनी मुलाने स्वत: थाटलेल्या सुखी संसाराचा स्वीकार केला. जात , धर्म , याला फाटा देऊन आदर्श निर्माण केला.खान्देशी रूढीप्रमाणे मुलाचे जावळं देण्याची वेळ आली, त्यावेळी कोणीतरी सांगितले की, विवाह विधीवत झालेला असावा. आणि काय बापू पाटलांनीच परमेश्वर व रसीलाचा विवाह आनंदात लावून देण्याचा निर्णय घेतला. १४ मार्चचा मुहूर्त ठरला. काही नातेवाईक, समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली मात्र त्यांच्या नाराजीला न जुमानता ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न लावण्यात आले. गावपंगतही देण्यात आली. कोण येईल आणि कोण आला नाही ? याचा विचार न करता एका गरीब शेतकºयाने मुलाच्या सुखी संसारासाठी केलेले धाडस कौतुकास्पद असून ते जातीयवाद व भावकी, गावकीच्या जोखडात गुंतलेल्या समाजाला झणझणीत अंजन घालणारेही आहे.