शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

‘बीन फेरे हम तेरे’ चे रुपांतर झाले ‘हे बंध रेशमाचे’मध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:45 IST

गुजराथमधील दमण येथे कंपनीत काम करीत असताना परमेश्वर नामक तरुणाचे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिच्याशी संसार करीत असतांना दोन अपत्य झाले. तथापि मुलाचे जावळं काढण्यासाठी विधीवत विवाह झालेला पाहिजे या रुढीप्रमाणे या दाम्पत्याचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे १४ मार्च रोजी विधीवत विवाह लावण्यात आला.

ठळक मुद्देआधी अपत्य आणि नंतर झाला विवाहमंगरूळ येथील तरुणाने घेतले आदिवासी मुलीशी सात फेरेपुत्राच्या पाठीशी पिता खंबीरपणे राहिला उभा

लोकमत आॅनलाईनअमळनेर, दि.१५ : मानवी जीवनात तारुण्यात आधी विवाह त्यानंतर मुलेबाळे असा सांसरिक जीवनाचा नियम आहे. मात्र प्रेमसंबंध जुळलेल्या परमेश्वराने ‘रसीला’शी संसार करून मुले जन्माला घातली आणि मग रितसर १४ मार्च रोजी विधीवत विवाह केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. परमेश्वराच्या या विवाहात समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याच्या पित्याने खंबीरपणे पाठीमागे उभे राहून साथ दिली.अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील परमेश्वर बापू पाटील हा २००२ मध्ये नववीत असताना शाळा सोडली आणि बकऱ्या चारु लागला . मात्र मिळणाºया मोबदल्यात पोट भरणे अवघड झाले म्हणून मंगरूळ सोडले आणि गुजरातमधील दमण गाठले. तेथे फायबर पेस्टल कंपनीत कामगार म्हणून काम करू लागला. त्याच ठिकाणी गुजराथी आदिवासी तरुणी ‘रसीला’ ही देखील कामाला येऊ लागली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांवर जीव जडला. तोपर्यंत परमेश्वर तेथील लहान मोठ्या कामाचे कंत्राट घेऊ लागला. एक दिवस दोघांनी आयुष्यभर साथ राहण्याचा निर्णय घेतला आणि एका लहानशा मंदिरात जाऊन पाषाणातील देवाच्या साक्षीने परमेश्वराने रसीलाच्या गळ्यात हार टाकून तिला आपली अर्धांगिनी मानले.दोघांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या प्रेमाचे ‘प्रतीक’ जन्माला आले. पुन्हा दोन वर्षांनी दोघांचे प्रेम ‘उज्वल’ करणारी कन्या जन्माला आली. त्यादरम्यान परमेश्वर याच्या भावाचा मृत्यू झाला. त्याने गुजरात सोडले. त्याचा मुलगा प्रतीक ५ वर्षाचा तर उज्वला ३ वर्षांची झाली. त्या दरम्यान परमेश्वराने बोईसर गाठले. जुन्या व्यवस्थापकाच्या मदतीने कॅम्लिन कंपनीत रेयॉन खडूंना रॅपर लावण्याचे कंत्राट मिळवले आणि जीवनाची घडी व्यवस्थित बसवली. इकडे मंगरूळ ग्रामीण भाग असल्याने मराठा समाजाच्या मुलाने आदिवासी मुलगी केली म्हणून समाज नाक- तोंड मोडू लागला होता. मात्र परमेश्वराचे वडील बापू पाटील हे साधे भोळे शेतकरी, परिस्थितीने गरीब माणूस. पण विचारांनी व मनाने खूप मोठा माणूस. त्यांनी मुलाने स्वत: थाटलेल्या सुखी संसाराचा स्वीकार केला. जात , धर्म , याला फाटा देऊन आदर्श निर्माण केला.खान्देशी रूढीप्रमाणे मुलाचे जावळं देण्याची वेळ आली, त्यावेळी कोणीतरी सांगितले की, विवाह विधीवत झालेला असावा. आणि काय बापू पाटलांनीच परमेश्वर व रसीलाचा विवाह आनंदात लावून देण्याचा निर्णय घेतला. १४ मार्चचा मुहूर्त ठरला. काही नातेवाईक, समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली मात्र त्यांच्या नाराजीला न जुमानता ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न लावण्यात आले. गावपंगतही देण्यात आली. कोण येईल आणि कोण आला नाही ? याचा विचार न करता एका गरीब शेतकºयाने मुलाच्या सुखी संसारासाठी केलेले धाडस कौतुकास्पद असून ते जातीयवाद व भावकी, गावकीच्या जोखडात गुंतलेल्या समाजाला झणझणीत अंजन घालणारेही आहे.