शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘बीन फेरे हम तेरे’ चे रुपांतर झाले ‘हे बंध रेशमाचे’मध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:45 IST

गुजराथमधील दमण येथे कंपनीत काम करीत असताना परमेश्वर नामक तरुणाचे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिच्याशी संसार करीत असतांना दोन अपत्य झाले. तथापि मुलाचे जावळं काढण्यासाठी विधीवत विवाह झालेला पाहिजे या रुढीप्रमाणे या दाम्पत्याचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे १४ मार्च रोजी विधीवत विवाह लावण्यात आला.

ठळक मुद्देआधी अपत्य आणि नंतर झाला विवाहमंगरूळ येथील तरुणाने घेतले आदिवासी मुलीशी सात फेरेपुत्राच्या पाठीशी पिता खंबीरपणे राहिला उभा

लोकमत आॅनलाईनअमळनेर, दि.१५ : मानवी जीवनात तारुण्यात आधी विवाह त्यानंतर मुलेबाळे असा सांसरिक जीवनाचा नियम आहे. मात्र प्रेमसंबंध जुळलेल्या परमेश्वराने ‘रसीला’शी संसार करून मुले जन्माला घातली आणि मग रितसर १४ मार्च रोजी विधीवत विवाह केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. परमेश्वराच्या या विवाहात समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याच्या पित्याने खंबीरपणे पाठीमागे उभे राहून साथ दिली.अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील परमेश्वर बापू पाटील हा २००२ मध्ये नववीत असताना शाळा सोडली आणि बकऱ्या चारु लागला . मात्र मिळणाºया मोबदल्यात पोट भरणे अवघड झाले म्हणून मंगरूळ सोडले आणि गुजरातमधील दमण गाठले. तेथे फायबर पेस्टल कंपनीत कामगार म्हणून काम करू लागला. त्याच ठिकाणी गुजराथी आदिवासी तरुणी ‘रसीला’ ही देखील कामाला येऊ लागली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांवर जीव जडला. तोपर्यंत परमेश्वर तेथील लहान मोठ्या कामाचे कंत्राट घेऊ लागला. एक दिवस दोघांनी आयुष्यभर साथ राहण्याचा निर्णय घेतला आणि एका लहानशा मंदिरात जाऊन पाषाणातील देवाच्या साक्षीने परमेश्वराने रसीलाच्या गळ्यात हार टाकून तिला आपली अर्धांगिनी मानले.दोघांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या प्रेमाचे ‘प्रतीक’ जन्माला आले. पुन्हा दोन वर्षांनी दोघांचे प्रेम ‘उज्वल’ करणारी कन्या जन्माला आली. त्यादरम्यान परमेश्वर याच्या भावाचा मृत्यू झाला. त्याने गुजरात सोडले. त्याचा मुलगा प्रतीक ५ वर्षाचा तर उज्वला ३ वर्षांची झाली. त्या दरम्यान परमेश्वराने बोईसर गाठले. जुन्या व्यवस्थापकाच्या मदतीने कॅम्लिन कंपनीत रेयॉन खडूंना रॅपर लावण्याचे कंत्राट मिळवले आणि जीवनाची घडी व्यवस्थित बसवली. इकडे मंगरूळ ग्रामीण भाग असल्याने मराठा समाजाच्या मुलाने आदिवासी मुलगी केली म्हणून समाज नाक- तोंड मोडू लागला होता. मात्र परमेश्वराचे वडील बापू पाटील हे साधे भोळे शेतकरी, परिस्थितीने गरीब माणूस. पण विचारांनी व मनाने खूप मोठा माणूस. त्यांनी मुलाने स्वत: थाटलेल्या सुखी संसाराचा स्वीकार केला. जात , धर्म , याला फाटा देऊन आदर्श निर्माण केला.खान्देशी रूढीप्रमाणे मुलाचे जावळं देण्याची वेळ आली, त्यावेळी कोणीतरी सांगितले की, विवाह विधीवत झालेला असावा. आणि काय बापू पाटलांनीच परमेश्वर व रसीलाचा विवाह आनंदात लावून देण्याचा निर्णय घेतला. १४ मार्चचा मुहूर्त ठरला. काही नातेवाईक, समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली मात्र त्यांच्या नाराजीला न जुमानता ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न लावण्यात आले. गावपंगतही देण्यात आली. कोण येईल आणि कोण आला नाही ? याचा विचार न करता एका गरीब शेतकºयाने मुलाच्या सुखी संसारासाठी केलेले धाडस कौतुकास्पद असून ते जातीयवाद व भावकी, गावकीच्या जोखडात गुंतलेल्या समाजाला झणझणीत अंजन घालणारेही आहे.