शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

वीजेपासून बचावासाठी सावध रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:29 IST

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र मोकळ्या जागेत, झाडावर वीज कोसळून त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांचा, गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडतात.भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणाऱ्या लोकांचे असतात. महाराष्टÑात विजेमुळे होणाºया एकूण मृत्यूपैकी ८६ टक्के मृत्यू शेतावर काम करणाºया व्यक्तींचे होतात. त्यामुळे कोसळणाºया विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना आसरा घेण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत म्हणजेच ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल असे. उदा.घर, शाळा, कार्यालयाची इमारत आदी. तसेच धातूचे बंदिस्त वाहन म्हणजेच चारचाकी वाहन त्यातही टारपोलीनचे छत असलेली वाहने सुरक्षित नाहीत. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हाच सुरक्षित आसरा शोधावा. वादळात बहुदा गुरेढोरे, माणसेही झाडाखाली गोळा होतात. आणि विजेच्या एका झटक्यात बळी पडतात. उंच, एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे कदाचित पाऊस लागणार नाही. मात्र वीज कोसळण्याची शक्यता तिथेच जास्त असते. तसेच मोकळ्या मैदानातही थांबू नका. किंवा अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा जिथे वीजप्रतिबंधक उपाययोजना असते, अशा सुरक्षित ठिकाणी न्यावे.-नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव