शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

मनपाच्या आदेशाला गाळेधारकांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच बुधवारी मनपा उपायुक्तांनी प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाच्या आदेशाला गाळेधारकांनी केराची टोपली दाखविली आहे. कारण, एकाही गाळेधारकाने मनपाकडे थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. यामुळे आता मनपा प्रशासन ‘ॲक्शन’मध्ये येण्याची शक्यता असून, सोमवारपासून मनपाकडून कारवाईला सुरुवात होणार आहे. याबाबत मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागासह इतर विभागालाही तयार राहण्याचा सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरातील वाढत जाणाऱ्या समस्या व त्या समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे नसलेला पुरेसा निधी यामुळे मनपा प्रशासन गाळे कारवाईच्या तयारीत आहे. मनपाने सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सर्वच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा बजावून थकीत रक्कमा भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या चार महिन्यातदेखील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. आता पुन्हा मनपा प्रशासनाने गाळेधारकांना सूचना दिल्या असून, आताही गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरण्यास नकार दिला आहे.

मनपाची तयारी पूर्ण, कारवाई अटळ

मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ही रक्कम न भरल्यास गाळे सील करण्याची सूचना दिली आहे. मनपाकडून गाळे कारवाईबाबत किरकोळ वसुली विभागातील अधिकाऱ्यांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्याही अधिकाऱ्यांना तयार राहण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात मोठे थकबाकीदार गाळेधारक मनपाच्या रडारवर राहणार आहेत. याबाबतची यादी देखील मनपाने तयार केली असून, पहिल्यांदाच मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा नाही

मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणाबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवू दिला नाही. आता पुढील कार्यवाहीसाठी मनपा प्रशासन या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी वेळ खर्ची करण्याचा तयारीत नसल्याचाच मूड मध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने काम पूर्ण केले असून, पदाधिकारी जो निर्णय घेतील तो त्यांनी घ्यावा मात्र, प्रशासन आता तयारीत असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.