शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनपाच्या आदेशाला गाळेधारकांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकीत भाड्याच्या रकमेसह नुकसानभरपाईच्या नोटिसा मनपाने बजावल्या आहेत. तसेच बुधवारी मनपा उपायुक्तांनी प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाच्या आदेशाला गाळेधारकांनी केराची टोपली दाखविली आहे. कारण, एकाही गाळेधारकाने मनपाकडे थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. यामुळे आता मनपा प्रशासन ‘ॲक्शन’मध्ये येण्याची शक्यता असून, सोमवारपासून मनपाकडून कारवाईला सुरुवात होणार आहे. याबाबत मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागासह इतर विभागालाही तयार राहण्याचा सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरातील वाढत जाणाऱ्या समस्या व त्या समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे नसलेला पुरेसा निधी यामुळे मनपा प्रशासन गाळे कारवाईच्या तयारीत आहे. मनपाने सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सर्वच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा बजावून थकीत रक्कमा भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या चार महिन्यातदेखील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम भरली नाही. आता पुन्हा मनपा प्रशासनाने गाळेधारकांना सूचना दिल्या असून, आताही गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरण्यास नकार दिला आहे.

मनपाची तयारी पूर्ण, कारवाई अटळ

मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ही रक्कम न भरल्यास गाळे सील करण्याची सूचना दिली आहे. मनपाकडून गाळे कारवाईबाबत किरकोळ वसुली विभागातील अधिकाऱ्यांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्याही अधिकाऱ्यांना तयार राहण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात मोठे थकबाकीदार गाळेधारक मनपाच्या रडारवर राहणार आहेत. याबाबतची यादी देखील मनपाने तयार केली असून, पहिल्यांदाच मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा नाही

मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणाबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवू दिला नाही. आता पुढील कार्यवाहीसाठी मनपा प्रशासन या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी वेळ खर्ची करण्याचा तयारीत नसल्याचाच मूड मध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने काम पूर्ण केले असून, पदाधिकारी जो निर्णय घेतील तो त्यांनी घ्यावा मात्र, प्रशासन आता तयारीत असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.