शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

पारोळा तालुक्यात धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 22:52 IST

लहान मोठय़ा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने तालुक्यासह पारोळा शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगिरणा धरणाचे पाणी बोरीत टाकण्याच्या मागणीसाठी आमदारांनी केले होते उपोषणजलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पुर्तता नाहीतीन गावात टँकरने पाणी पुरवठा, चार गावांचा प्रस्ताव पाठविला

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.31 : तालुक्यातील बोरी, भोकरबारी, म्हसव,े शिरसमणी, पिंपळकोठा, भोलाणे, कंकराज या लघुप्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दरम्यान, पारोळा शहराला बोरी धरणातून पाणी पुरवठा होतो, सद्या शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असून फक्त एक महिना शहराला त्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आगामी काळात धरणातील पाणी संपले की दुसरा पर्याय नाही, लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागणार आहे. पाण्याचे राजकारण ? दरम्यान, गिरणा धरणाचे पाणी बोरी धरणात टाकण्याच्या मागणीसाठी तालुक्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तेव्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑक्टोबरनंतर गिरणाचे पाणी बोरीत टाकण्याचे आश्वासन दिले होते, पण 1 नोव्हेंबर उजाडला तरी काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पाण्याचे राजकारण झाले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . कारण याबाबत अधिकारी वर्गाची देखील बैठक झाली नाही. बोरी धरणावर 40 गावे अवलंबून बोरी धरणावर शहरासह 40 गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. वेळीच गिरणा धरणाचे पाणी आले नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे धरणात मृतसाठा आहे. या धरणावर जिराळी, वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा, शिरसोदे, बहादरपूर, महालपूर यासह इतर तीन गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. भोकरबारी या धरणावर सडावन, र}ापिंप्री, शेवगे बुद्रूक, शेळावे बुद्रूक आणि खुर्द या सहा गावांच्या पाणी योजनेचा समावेश आहे. तर शिरसमणी लघु प्रकल्पावर शिरसमणीसह चोरवड, सुधाकरनगर ही तीन गावे अवलंबून आहेत. सर्व लघु प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा आहे. त्यामुळे आगामी काळातील चिंता आतापासूनच सतावत आहे. तालुक्यातील खेडीढोक, नेरपाट जिराळी या तीन गावांना पाण्याचे टँकर सुरु आहेत तर मोहाडी, दहीगाव मंगरूळ, कंकराज या गावांना टँकर सुरु करण्यासाठी पंचायत समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . पुन्हा पाठविले स्मरणपत्र दरम्यान, बोरी धरणात गिरणा धरणाचे पाणी तात्काळ टाकून जलसंकटावर मात करण्यासंदर्भात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिका:यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. त्यामुळे आता कधी गिरणाचे पाणी बोरीत टाकतात या कडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.