शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पारोळा तालुक्यात धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 22:52 IST

लहान मोठय़ा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने तालुक्यासह पारोळा शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगिरणा धरणाचे पाणी बोरीत टाकण्याच्या मागणीसाठी आमदारांनी केले होते उपोषणजलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पुर्तता नाहीतीन गावात टँकरने पाणी पुरवठा, चार गावांचा प्रस्ताव पाठविला

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.31 : तालुक्यातील बोरी, भोकरबारी, म्हसव,े शिरसमणी, पिंपळकोठा, भोलाणे, कंकराज या लघुप्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दरम्यान, पारोळा शहराला बोरी धरणातून पाणी पुरवठा होतो, सद्या शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असून फक्त एक महिना शहराला त्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आगामी काळात धरणातील पाणी संपले की दुसरा पर्याय नाही, लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागणार आहे. पाण्याचे राजकारण ? दरम्यान, गिरणा धरणाचे पाणी बोरी धरणात टाकण्याच्या मागणीसाठी तालुक्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तेव्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑक्टोबरनंतर गिरणाचे पाणी बोरीत टाकण्याचे आश्वासन दिले होते, पण 1 नोव्हेंबर उजाडला तरी काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पाण्याचे राजकारण झाले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . कारण याबाबत अधिकारी वर्गाची देखील बैठक झाली नाही. बोरी धरणावर 40 गावे अवलंबून बोरी धरणावर शहरासह 40 गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. वेळीच गिरणा धरणाचे पाणी आले नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे धरणात मृतसाठा आहे. या धरणावर जिराळी, वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा, शिरसोदे, बहादरपूर, महालपूर यासह इतर तीन गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. भोकरबारी या धरणावर सडावन, र}ापिंप्री, शेवगे बुद्रूक, शेळावे बुद्रूक आणि खुर्द या सहा गावांच्या पाणी योजनेचा समावेश आहे. तर शिरसमणी लघु प्रकल्पावर शिरसमणीसह चोरवड, सुधाकरनगर ही तीन गावे अवलंबून आहेत. सर्व लघु प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा आहे. त्यामुळे आगामी काळातील चिंता आतापासूनच सतावत आहे. तालुक्यातील खेडीढोक, नेरपाट जिराळी या तीन गावांना पाण्याचे टँकर सुरु आहेत तर मोहाडी, दहीगाव मंगरूळ, कंकराज या गावांना टँकर सुरु करण्यासाठी पंचायत समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . पुन्हा पाठविले स्मरणपत्र दरम्यान, बोरी धरणात गिरणा धरणाचे पाणी तात्काळ टाकून जलसंकटावर मात करण्यासंदर्भात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिका:यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. त्यामुळे आता कधी गिरणाचे पाणी बोरीत टाकतात या कडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.