शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पारोळा तालुक्यात धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 22:52 IST

लहान मोठय़ा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने तालुक्यासह पारोळा शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगिरणा धरणाचे पाणी बोरीत टाकण्याच्या मागणीसाठी आमदारांनी केले होते उपोषणजलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पुर्तता नाहीतीन गावात टँकरने पाणी पुरवठा, चार गावांचा प्रस्ताव पाठविला

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.31 : तालुक्यातील बोरी, भोकरबारी, म्हसव,े शिरसमणी, पिंपळकोठा, भोलाणे, कंकराज या लघुप्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दरम्यान, पारोळा शहराला बोरी धरणातून पाणी पुरवठा होतो, सद्या शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असून फक्त एक महिना शहराला त्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आगामी काळात धरणातील पाणी संपले की दुसरा पर्याय नाही, लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागणार आहे. पाण्याचे राजकारण ? दरम्यान, गिरणा धरणाचे पाणी बोरी धरणात टाकण्याच्या मागणीसाठी तालुक्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तेव्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑक्टोबरनंतर गिरणाचे पाणी बोरीत टाकण्याचे आश्वासन दिले होते, पण 1 नोव्हेंबर उजाडला तरी काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पाण्याचे राजकारण झाले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . कारण याबाबत अधिकारी वर्गाची देखील बैठक झाली नाही. बोरी धरणावर 40 गावे अवलंबून बोरी धरणावर शहरासह 40 गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. वेळीच गिरणा धरणाचे पाणी आले नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे धरणात मृतसाठा आहे. या धरणावर जिराळी, वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा, शिरसोदे, बहादरपूर, महालपूर यासह इतर तीन गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. भोकरबारी या धरणावर सडावन, र}ापिंप्री, शेवगे बुद्रूक, शेळावे बुद्रूक आणि खुर्द या सहा गावांच्या पाणी योजनेचा समावेश आहे. तर शिरसमणी लघु प्रकल्पावर शिरसमणीसह चोरवड, सुधाकरनगर ही तीन गावे अवलंबून आहेत. सर्व लघु प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा आहे. त्यामुळे आगामी काळातील चिंता आतापासूनच सतावत आहे. तालुक्यातील खेडीढोक, नेरपाट जिराळी या तीन गावांना पाण्याचे टँकर सुरु आहेत तर मोहाडी, दहीगाव मंगरूळ, कंकराज या गावांना टँकर सुरु करण्यासाठी पंचायत समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . पुन्हा पाठविले स्मरणपत्र दरम्यान, बोरी धरणात गिरणा धरणाचे पाणी तात्काळ टाकून जलसंकटावर मात करण्यासंदर्भात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिका:यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. त्यामुळे आता कधी गिरणाचे पाणी बोरीत टाकतात या कडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.