शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हरियाणाच्या टोळीनेच फोडले जळगाव जिल्ह्यातील बॅँकाचे एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:10 IST

जिल्ह्यातील भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविणारी टोळी हरियाणातील मेवान जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीने बडोद्यात ६ एटीएम फोडून ३३ लाख तर सुरतमध्ये दोन एटीएममधून एक कोटी रुपये लांबविले आहेत. दरम्यान, चोरटे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या गुजरात व कोलकाता पोलिसांवर या टोळीने गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे.  

ठळक मुद्दे सुरतमध्ये एकाच रात्री एक कोटी लांबविलेचोरीची चारचाकी व सीसीटीव्ही फुटेजवरुन झाला उलगडा अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर झाला होता गोळीबार

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : जिल्ह्यातील भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविणारी टोळी हरियाणातील मेवान जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीने बडोद्यात ६ एटीएम फोडून ३३ लाख तर सुरतमध्ये दोन एटीएममधून एक कोटी रुपये लांबविले आहेत. दरम्यान, चोरटे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या गुजरात व कोलकाता पोलिसांवर या टोळीने गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे.

 गेल्या महिन्यात १४ जानेवारी रोजी भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविले होते. एटीएम फोडण्याआधी या चोरट्यांनी भुसावळमधून एक चारचाकी चोरली होती. ही चार चाकी दुसºया दिवशी बडोदा शहरात एका एटीएमच्या बाजुला आढळून आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बडोदा येथे गेले असता तेथेही या चोरट्यांनी सहा ठिकाणचे एटीएम फोडले होते. हनुमान टेंपल, मकरापुरा, वागोडीया रोड, सनप्लाझा, माजलपुर कॉलनी व अन्य एक अशा सहा ठिकाणचे एटीएम फोडून त्यातील ३३ लाख रुपये या टोळीने लांबविले होते.  

सीसीटीव्ही व चारचाकीवरुन उलगडा  

जळगाव जिल्ह्यात एटीएम फोडणाºया टोळीनेच बडोदा व सुरत शहरात एटीएम फोडल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेज व भुसावळची चोरलेली चारचाकी बडोद्यात आढळल्याने या गोष्टीचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र होळकर, विजय पाटील, रवींद्र पाटील व विनयकुमार देसले यांच्या पथकाला गुजरातमध्ये पाठविले होते. या पथकाने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

सुरतमध्ये नोव्हेंबर महिन्यात एकाच खोलीत असलेले दोन एटीएम मशीन फोडून त्यातील तब्बल एक कोटी रुपये याच टोळीने लांबविले आहेत.  रेल्वेचे जंक्शन शहरेच टार्गेट  रेल्वेचे जंक्शन असलेले शहरच या टोळीने टार्गेट केले आहेत. ज्या शहरात एटीएम फोडायचे तेथून एक चार चाकी वाहन चोरी केले जाते. त्यानंतर गॅस कटर, गॅस सिलिंडर व अन्य साहित्य खरेदीसाठी एक जण एक दिवस आधी त्या शहरात येतो. गॅस कटरने एटीएम फोडले की त्याच वाहनातून ही टोळी पुढच्या शहरात जाते. जेथे शेवट करायचा, तेथे चोरलेली गाडी सोडून सर्व जण वेगळे होतात व बसने आपल्या गावात पोहचतात.