शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जिल्हाध्यक्षांकडून एकनाथराव खडसेंना कमी लेखण्यासाठी बँकेची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:59 IST

अनिल भाईदास पाटील यांचा आरोप

ठळक मुद्देचमचेगिरीसाठी चमकोगिरी! बँकेची बदनामी करण्याचे उद्योग सुरू

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे कुणाची तरी चमचेगिरी करून पदरात पदाचा लाभ पाडून घेण्यासाठी माजी मंत्री खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी सोमवार, २८ रोजी दुपारी जिल्हा बँकेत आयोजित पत्रपरिषदेत केली.शेतीचा हंगाम जवळ आलेला असतानाही जिल्हा बँकेकडून पिक कर्ज वाटपास दिरंगाई होत असल्याचा तसेच बँकेचे स्थानिक संचालक शेतकऱ्यांची भूमिका बँकेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी उगीचच आकाशवाणी करीत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला होता. त्याला वाघ यांचे प्रतिस्पर्धी व राष्टÑवादीचे जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे उत्तर दिले. ते म्हणाले की, कर्जमाफीचे कामकाज लांबल्यामुळे जिल्हाभरातील गटसचिव शेतकरी कर्जमाफीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे गटसचिवांना त्यांच्या संस्थेचे त्रैवार्षिक तक्ते तयार करून बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यास विलंब झाला. मार्च २०१८ अखेर एकही तक्ता बँकेकडे मंजुरीसाठी प्राप्त झालेला नव्हता. मात्र एकही शेतकरी सभासद कर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकेने कर्ज मंजुरी तक्ते बँकेकडे पाठविण्यास जून २०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. कर्जमंजुरी तक्ते का प्राप्त होत नाहीत? याची चौकशी करण्यासाठी गटसचिवांची तालुकास्तरावर बैठक बँकेच्या अधिकाºयांसह बोलविली होती. तेव्हा तक्त्यातील प्रत्येक सभासदाचे आधारकार्ड नंबर अनिवार्य असल्याने त्याची पूर्तता करण्यास शेतकºयांकडून विलंब होत असल्याने या तक्त्यांना विलंब झाला. त्यात बँक किंवा बँकेचे विद्यमान संचालक कोठेही कमी पडलेले नाहीत. मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष वाघ यांनी ही बँक भाजपाचेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ताब्यात असल्याचे माहित असतानाही कुणाची तरी चमचेगिरी करण्यासाठी हेतूपूर्वक आरोप केले.वास्तविक मार्चनंतर जसजसे तक्ते प्राप्त झाले तसतसे ते मंजूर करण्यात आले. बँकेच्या जिल्ह्यातील ८७७ सभासद संस्थांपैकी प्राप्त ७२६ संस्थांचे सर्वच्या सर्व तक्ते जिल्हा बँकेने आजअखेरपर्यंत मंजूर करून पाठविले आहेत. जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण २०० कोटींचे पिककर्ज वाटप केलेले आहे. हे काम जलद गतीने सुरू आहे.शासनाचे धोरण व आरबीआयच्या नियमामुळे शेतकºयांचे प्रचंड हाल शासनाकडून केले जात आहेत. एटीएममधून पैसे काढणे हा नियम बँकेचा नसून शासनाचा आहे. या विरोधात राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकेच्या माध्यमातून शासनाकडे शेतकºयांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पक्षाचेच सरकार आहे. त्यांच्या पत्नी आमदार आहेत. त्यांना जर खरोखरच शेतकºयांचा कळवळा असता तर शेतकरी सभासदांना स्वत:च्याच पैशांसाठी उन्हात एटीएमसमोर उभे राहण्याची वेळ आली नसती.भाजपा जिल्हाध्यक्षांनी याबाबत शासनासमोर काय शेतकºयांची बाजू मांडली? वाघ हे किती धुतल्या तांदळाचे आहेत? ते जिल्हा बँकेत संचालक झाल्यावर समजले. बँकेला आवश्यक असलेली छपाईची कामे २००५,०६,०७ मध्ये वाढीव दराने केली. जी कामे आज आॅनलाईन निविदेमुळे तेव्हाच्या दराच्या निम्म्या दरात होत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर त्यांना काम देणे थांबवली. त्यामुळे बँक वर्ष अखेरीस नफ्यात आली. ही खदखद वाघ यांच्यासह काही नेत्यांना असल्यानेच बँकेची बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत.वाघ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्यासोबत लोकांसमोर यावे. त्यांनी भोगलेल्या मार्केट सभापतीपद, आमदार स्मिता वाघ यांचा आमदारकीचा व जि.प. अध्यक्षपदाचा कालावधी, या सर्व कालावधीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची तयारी असल्याचे आव्हान अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे कोण कर्तृत्ववान, आणि कोण भ्रष्टाचारी हे सिद्ध होईल. आणि जरी हे आव्हान वाघ यांनी स्विकारले नाही तरी हे सर्व पुराव्यांसह जनतेसमोर मांडणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव