शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथे बंजारा अहिंसा संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:55 IST

बोकड बळी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

ठळक मुद्देअनिष्ट प्रथा रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक : अविनाश पाटीलप्राणी मित्र इंदल चव्हाण यांचा नागरी सत्कार

चाळीसगाव, जि.जळगाव : बोकड बळी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बोकड बळीची प्रथा बऱ्याचशा प्रमाणात बंद झाल्या असल्यातरी काही प्रमाणात सुरू आहे. या प्रथेला रोखण्यासाठी सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे झालेल्या बंजारा अहिंसा संमेलनात केले.प्राणी मित्र इंदल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन, यात्रेतील पशुहत्या विरोध चळवळीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सव, बंजारा अहिंसा संमेलन व प्राणी मित्र इंदल चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अविनाश पाटील बोलत होते.परमपूज्य दगाजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे कार्य प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी हाती घेऊन, यात्रेतील बोकड बळी प्रथा, अनिष्ट रूढी परंपरा या विरोधात राज्यभर जनजागृती अभियान राबविले. गेली २५ वर्षे सतत संघर्ष करणारे इंदल चव्हाण यांच्या कार्याचे फलित झाल्याचे समाजाने स्वीकारले.अध्यक्षस्थानी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून संतोषजी महाराज चोपाळेकर, भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड, निवृत्त पोलीस उपअधीक्षक यू.एन.राठोड, जि.प.चे माजी सदस्य सुभाष चव्हाण, रामदास रायसिंग जाधव, काशिनाथ राठोड, देवेंद्र नायक, चिंतामण चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र राठोड, कैलास सूर्यवंशी, मदन राठोड, जवाहरलाल राठोड, साहेबराव पुना राठोड, सरपंच सारिका राठोड, संतोष राठोड, ओंकार जाधव, अ‍ॅड.वाडीलाल चव्हाण, भरत चव्हाण, बळीराम माऊली आदी सर्व विविध पक्ष, संघटनेचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश पोतदार व भीमराव जाधव यांनी केले. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव