शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कडाक्याच्या थंडीमुळे केळी गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 23:27 IST

केºहाळेसह रावेर तालुक्यातील स्थिती : निसवण क्षमता मंदावली, मका, हरभºयाला ग्लुकोज

केºहाळे, ता.रावेर : गत काही दिवसांपासून थंडीचा पारा असह्य झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे करप्यासह चरक्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे ऐन निसवण्याच्या बहारात असलेली केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रब्बीतील हरभरा, मका, गहू या पिकांसाठी थंडी उपायकारक असते. परंतु केळीसाठी अतिथंडी अपायकारक ठरत आहे. थंडीमुळे केळीच्या पानांवर पिवळसरपणा आल्यामुळे चरका आला आहे. यामुळे पाने कोरडी पडण्यास सुरुवात म्हणजेच पाने निर्जीव होत आहेत. याचा परिणाम खोडाच्या वाढीवर प्रत्यक्ष झाला आहे. प्रकाश क्रिया मंदावल्यामुळे पानांच्या पेशीद्वारे मिळणारे ऊर्जास्त्रोत थांबतात व जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य घेण्यास मदत होत नाही. यामुळे खोडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मृगबहार केळीच्या लागवड केलेल्या बेण्याप्रमाणे  जानेवारी महिन्यात बºयाच शेतकºयांच्या शेतातील केळीची खोडे निसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याच वेळेत थंडीने घात केल्यामुळे केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. याचा थेट परिणाम केळीच्या घडावर होत आहे. कारण पुरेसे अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे घडाची निसवण पूर्णत: होत नाही. परिणामी घड लहान पडत आहेत व सरासरी उत्पन्न घटणार आहे. केळी उत्पादनावर मात करण्यासाठी केळीचे घड निसवण्याची प्रक्रिया तेवढीच महत्त्वाची आहे. केळी लागवड व वाढ झाल्यानंतर खरा भाग निसवण्याचा असतो. निसवण चांगली व दमदार झाल्यास घडाचे वजन, केळीची रुंदी, लांबी मोठी असते, यामुळे उत्पादनाची सरासरी गाठता येते. आधीच काहीशा प्रमाणात असलेल्या करप्यामुळे केळी खोडांच्या खालच्या बाजूची पाने कोरडी पडलेली आहेत. मात्र थंडीच्या वाढीमुळे खोडांच्या वरील पानेसुद्धा पिवळी पडून निर्जीव होत असल्याने करप्याला बळ मिळत असते. त्यामुळे एकंदरीत केळीची वाताहत होते. (वार्ताहर) उत्पन्नावर परिणाम: उपाययोजना हव्यात...४कडाक्याची थंडी आणि करप्याची लागण यामुळे केळीच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता जाणकार शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. करप्यावर प्रभावी ठरणारी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची शेतकºयांची मागणी आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांवर मोठ्या प्रमाणावर करप्याचे आक्रमण झाले आहे.  अतिप्रमाणात थंडी केळीकरिता अत्यंत नुकसानकारक आहे. यामुळे चरका व करप्याचे प्रमाण जास्त आहे. -प्रवीण महाजन, प्रगत शेतकरी, ऐनपूर