शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जळगावातील बालविश्व गुन्हेगारी विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 11:32 IST

दोन वर्षात १०४ बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सुनील पाटीलजळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वाधिक गुन्हेगार हे अल्पवयीन असून खून, खुनाचा प्रयत्न, मुलींचे अपहरण, दंगल, प्राणघातक हल्ला, दरोडा, छेडखानी व बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. २०१७ व २०१८ या दोन वर्षात तब्बल १०४ बालगुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जळगाव शहरात तर वेगवेगळ्या गृपच्या नावाने अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयात या टोळ्यांनी धुडगूस घातला. गेल्या वर्षभरात शिक्षकांवरही हल्लयाच्या घटना घडल्या आहेत. महिला व तरुणींची छेडखानी, फूस लावून पळवून नेणे, दुसऱ्याला मदत करणे यामध्ये देखील अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निष्पन्न झाला आहे. शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे.२०१७ मध्ये सर्वाधिक गुन्हे२०१७ या वर्षात अल्पवयीन मुलांवर सर्वाधिक ६० गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल, विनयभंग व बलात्कार या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. ज्या गोष्टी पूर्वी शक्य नव्हत्या, त्या आज मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल तसेच टी.व्ही. याच्यातील वाईट गोष्टींचेच जास्त अनुकरण केले जात आहे. २०१८ मध्ये ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे चोरीचे आहेत.चोºया व दरोड्यात अट्टलकाही बालगुन्हेगार चोºया, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यात अट्टल आहेत. विशेष म्हणजे उच्च घराण्यातीलही मुलांचा यात सहभाग आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर दरोड्यात ८ तर चोरीमध्ये २१ गुन्हेगार असले तरी रेकॉर्डवर न आलेल्या मुलांची संख्या त्याहूनही अधिक आहे. रिमांड होममध्ये अशाच गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, कायद्यातील पळवाटांमुळे गुन्हेगारांची संख्या अधिक वाढत चालली आहे. काही नामाकिंत गुन्हेगार हीच संधी साधून गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाच्य वयातच या मुलांनी गुन्हेगारीचे धडे गिरविले असून व्यसनाच्याही आहारी गेलेले आहेत.बलात्कार, अपहरण अन् छेडखानीपोलिसांच्या रेकॉर्डला असलेल्या गुन्ह्यांची संख्या चक्रावून टाकणारी आहे. बलात्कार, प्रेमप्रकरण, मुलींना पळवून नेणे व छेडखानी यासारख्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाच सहभाग निष्पन्न झाला आहे. दोन वर्षात ११ अल्पवयीन मुलांवर बलात्कार, छेडखानीचा १४ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही ४ मुलांचा सहभाग आढळून आला आहे.मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्याशिवाय आपला मुलगा काय करतो आहे, याकडे पालकांचेही लक्ष नसणे या दोन गोष्टी लहानमुलांना गुन्हेगारीकडे वळण्यात कारणीभूत ठरत आहेत. १६ ते २० या वयोगटातच मुलांना सांभाळणे गरजेचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. अन्यथा हीच मुले पुढे मोठी गुन्हेगार होतात.-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकीलगुन्हा हा लहान असो की मोठा, शेवटी तो गुन्हाच ठरतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. त्यामुळे कमी वयात मुलगा गुन्हेगारीकडे वळला तर त्याला रोखणे अशक्य असते. त्यासाठी पालकांनीच खबरदारी घेऊन मुलांवर लक्ष केंद्रीत करावे. कायदा आपले काम करीत राहणार. पोलिसांमार्फत नेहमीच शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाते.-डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव