शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

बळीराम पेठ, सुभाष चौक भागात दिवसभर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर व मुख्य चौकात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामुळे नेहमी गजबजलेला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात सोमवारी दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला. एकही भाजीपाला विक्रेत्याला मनपाच्या पथकाने दुकान थाटू दिले नाही.

सोमवारी मनपा व पोलीस प्रशासनाने शहरात मुख्य बाजारपेठ परिसरात गर्दी होणार नाही यासाठी चांगलीच दक्षता घेतल्याचे दिसून आले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईदेखील पोलीस व मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासह अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू राहणार नाहीत यासाठीही मनपाच्या पथकाने शहरभर पाहणी करून, काही दुकानदारांवर कारवाईदेखील केली आहे.

दहा दुकाने केली सील; ५० हजार रुपयांचा दंड वसूल

मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर व नवी पेठ परिसरातील दहा दुकाने सील केली आहेत. सर्व दुकाने ही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त व्यवसाय करणारी होती. तसेच काही कपड्यांच्या दुकानांमध्ये २०हून अधिक ग्राहक आढळून आले, तर काही दुकाने अर्धे शटर बंद करून व्यवसाय करत असल्याने या दुकानांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दहा दुकाने सील करून, प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांची वसुलीदेखील केली आहे.

सुभाष चौक, बळीराम पेठेत शुकशुकाट

सोमवारी मात्र मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सकाळी ६ वाजेपासूनच मुख्य बाजारपेठ परिसरात थांबून होते. त्यामुळे एकाही विक्रेत्याला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात दुकाने थाटू दिली नाहीत. त्यामुळे या भागात शुकशुकाट पहायला मिळाला.

चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

शहरातील मध्यवर्ती भागात गर्दी कमी करण्यासाठी चार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने टाॅवर चाैकाच्या चारही बाजूच्या मार्गावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी नगररचना विभागाचे रचना सहायक जयंत शिरसाठ यांच्यावर दाणाबाजार परिसराची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. समीर बाेराेले यांच्यावर वैभव गल्ली व बळीराम पेठ परिसराची, प्रसाद पुराणिक यांच्याकडे सुभाष चाैक ते पुष्पलता बेंडाळे चाैकापर्यंतचा मार्ग तसेच अतुल पाटील यांच्याकडे घाणेकर चाैक ते सुभाष चाैक परिसराची जबाबदारी साेपवली आहे.