शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बळीराम पेठ, सुभाष चौक भागात दिवसभर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर व मुख्य चौकात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामुळे नेहमी गजबजलेला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात सोमवारी दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला. एकही भाजीपाला विक्रेत्याला मनपाच्या पथकाने दुकान थाटू दिले नाही.

सोमवारी मनपा व पोलीस प्रशासनाने शहरात मुख्य बाजारपेठ परिसरात गर्दी होणार नाही यासाठी चांगलीच दक्षता घेतल्याचे दिसून आले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईदेखील पोलीस व मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासह अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू राहणार नाहीत यासाठीही मनपाच्या पथकाने शहरभर पाहणी करून, काही दुकानदारांवर कारवाईदेखील केली आहे.

दहा दुकाने केली सील; ५० हजार रुपयांचा दंड वसूल

मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर व नवी पेठ परिसरातील दहा दुकाने सील केली आहेत. सर्व दुकाने ही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त व्यवसाय करणारी होती. तसेच काही कपड्यांच्या दुकानांमध्ये २०हून अधिक ग्राहक आढळून आले, तर काही दुकाने अर्धे शटर बंद करून व्यवसाय करत असल्याने या दुकानांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दहा दुकाने सील करून, प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांची वसुलीदेखील केली आहे.

सुभाष चौक, बळीराम पेठेत शुकशुकाट

सोमवारी मात्र मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सकाळी ६ वाजेपासूनच मुख्य बाजारपेठ परिसरात थांबून होते. त्यामुळे एकाही विक्रेत्याला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात दुकाने थाटू दिली नाहीत. त्यामुळे या भागात शुकशुकाट पहायला मिळाला.

चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

शहरातील मध्यवर्ती भागात गर्दी कमी करण्यासाठी चार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने टाॅवर चाैकाच्या चारही बाजूच्या मार्गावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी नगररचना विभागाचे रचना सहायक जयंत शिरसाठ यांच्यावर दाणाबाजार परिसराची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. समीर बाेराेले यांच्यावर वैभव गल्ली व बळीराम पेठ परिसराची, प्रसाद पुराणिक यांच्याकडे सुभाष चाैक ते पुष्पलता बेंडाळे चाैकापर्यंतचा मार्ग तसेच अतुल पाटील यांच्याकडे घाणेकर चाैक ते सुभाष चाैक परिसराची जबाबदारी साेपवली आहे.